Monday 18 February 2019

Ease of Banking : RBI Circular - Senior Citizens

RBI/2017-18/89
DBR.No.Leg.BC.96/09.07.005/2017-18

November 9, 2017

All Scheduled Commercial Banks (including RRBs)
All Small Finance Banks and Payments Banks

Dear Sir/ Madam

Statement on Developmental and Regulatory Policies - October 4, 2017-Banking Facility for Senior Citizens and Differently abled Persons

Please refer to Paragraph 8 of Statement on Developmental and Regulatory Policies, released by Reserve Bank of India on October 4, 2017 as part of Fourth Bi-monthly Monetary Policy Statement 2017-18, a copy of which is enclosed. It has been observed that there are occasions when banks discourage or turn away senior citizens and differently abled persons from availing banking facilities in branches. Notwithstanding the need to push digital transactions and use of ATMs, it is imperative to be sensitive to the requirements of senior citizens and differently abled persons.

2. In view of the above, banks are required to put in place appropriate mechanism with the following specific provisions for meeting the needs of such customers so that they are able to avail of the bank’s services without difficulty.

(a) Dedicated Counters/Preference to Senior Citizens, Differently abled persons

Banks are advised to provide a clearly identifiable dedicated counter or a counter which provides priority to senior citizens and people who are differently abled including visually impaired persons.

(b) Ease of submitting Life Certificate

As per extant guidelines issued by Department of Government and Bank Accounts, in addition to the facility of Digital Life Certificate under “Jeevan Praman” Scheme (refer circular DGBA.GAD.H-2529/45.01.001/2014-15 dated December 9, 2014), pensioners can submit physical Life Certificate form at any branch of the pension paying bank. However, it is observed that often the same is not updated promptly by the receiving branch in the Core Banking Solution (CBS) system of the bank, resulting in avoidable hardship to the pensioners. It is, therefore, advised that banks shall ensure that when a Life Certificate is submitted in any branch, including a non-home branch, of the pension paying bank, the same is updated/ uploaded promptly in CBS by the receiving branch itself, to avoid any delay in credit of pension.

(c) Cheque Book Facility

(i) Banks shall issue cheque books to customers, whenever a request is received, through a requisition slip which is part of the cheque book issued earlier.

(ii) Banks are advised to provide minimum 25 cheque leaves every year, if requested, in savings bank account, free of charge.

(iii) Banks shall not insist on physical presence of any customer including senior citizens and differently abled persons for getting cheque books.

(iv) Banks may also issue cheque books, on requisition, by any other mode as per bank’s laid down policy.

It is further clarified that providing such facility in BSBDA will not render the account to be classified as non-BSBDA (c.f. Bank’s response to query number 14 and 24 of our circular “DBOD.No. Leg. BC.52/09.07.005/2013-14 dated September 11, 2013 on Financial Inclusion – Access to Banking Services - BSBDA – FAQs”).

(d) Automatic conversion of status of accounts

Presently, in some banks, even fully KYC - compliant accounts are not automatically converted into ‘Senior Citizen Accounts’ on the basis of date of birth maintained in the bank’s records. Banks are advised that a fully KYC compliant account should automatically be converted into a ‘Senior Citizen Account’ based on the date of birth available in bank’s records.

(e) Additional Facilities to visually impaired customers

Banks are advised that the facilities provided to sick/old/incapacitated persons vide Paragraph 9 of our Master Circular DBR.No.Leg.BC.21/09.07.006/2015-16 dated July 1, 2015 on Customer Service in Banks (regarding operations of accounts through identification of thumb/toe impression/mark by two independent witnesses and authorising a person who would withdraw the amount on behalf of such customers) shall also be extended to the visually impaired customers.

(f) Ease of filing Form 15G/H

Banks are advised to provide senior citizens and differently abled persons Form 15G/H once in a year (preferably in April) to enable them to submit the same, where applicable, within the stipulated time.

(g) Door Step Banking

We have issued instructions on Doorstep Banking vide circular DBOD.No.BL.BC.59/22.01.010/2006-2007 dated February 21, 2007 under Section 23 of Banking Regulation Act, 1949. However, in view of the difficulties faced by senior citizens of more than 70 years of age and differently abled or infirm persons (having medically certified chronic illness or disability) including those who are visually impaired, banks are advised to make concerted effort to provide basic banking facilities, such as pick up of cash and instruments against receipt, delivery of cash against withdrawal from account, delivery of demand drafts, submission of Know Your Customer (KYC) documents and Life certificate at the premises/ residence of such customers.

3. Banks are advised to implement these instructions by December 31, 2017 in letter and spirit and give due publicity in their bank branches and website.

Yours faithfully

(Saurav Sinha)
Chief General Manager


Statement on Developmental and Regulatory Policies, Reserve Bank of India issued by the Governor on October 4, 2017

8. Banking Facility for Senior Citizens and Differently abled Persons

It has been reported that banks are discouraging or turning away senior citizens and differently abled persons from availing banking facilities in branches. Notwithstanding the need to push digital transactions and use of ATMs, it is imperative to be sensitive to the requirements of senior citizens and differently abled persons. It has been decided to instruct banks to put in place explicit mechanisms for meeting the needs of such persons so that they do not feel marginalised. Ombudsmen will also be advised to pay heed to complaints in this context. Necessary instructions in this regard will be issued by end-October 2017.

कुलभूषणप्रकरणी आजपासून सुनावणी


पीटीआय

हेग (नेदरलॅंड) : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोचला असतानाच येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्यापासून (ता. 18) कुलभूषण जाधव प्रकरणाची सुनावणी सुरू होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या सुनावणीवेळी दोन्ही देश आपापले म्हणणे मांडतील.

कुलभूषण जाधव या भारताच्या माजी नौदल अधिकाऱ्याला पाकिस्तानने हेरगिरीच्या आरोपावरून डांबून ठेवले असून, त्यांना एप्रिल 2017 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र, भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेत या शिक्षेवर स्थगिती आणली असून, या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी वेळापत्रक आखून दिले असून, त्यानुसार 18 ते 21 फेब्रुवारीदरम्यान या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. माजी महाधिवक्ता हरीश साळवे हे भारताची बाजू मांडण्याची शक्‍यता असून, पाकिस्तानतर्फे बॅरिस्टर खावर कुरेशी युक्तिवाद करतील.

सुनावणीच्या चार दिवसांमध्ये 18 तारखेला भारत आपली बाजू मांडेल, तर 19 ला पाकिस्तान त्यांची बाजू मांडणार आहे. वीस तारखेला पाकिस्तानच्या युक्तिवादावर भारत उत्तर देईल आणि अखेरच्या दिवशी 21 तारखेला पाकिस्तान उत्तर देईल. या प्रकरणाचा निकाल याच वर्षी मे महिन्यापर्यंत लागेल, अशी अपेक्षा आहे. न्यायालयाचा निकाल मान्य असेल, असे पाकिस्तानने कबूल केले आहे.

दोन्ही देशांनी दरम्यानच्या काळात आपल्या याचिका आणि विरोधी पक्षांच्या याचिकांवरील उत्तरे लेखी सादर केली आहेत. पाकिस्तानने जाधव यांना वकील न पुरवून व्हिएन्ना कराराचा भंग केला असल्याचा आरोप केला आहे.

राजनैतिक कसोटी (अग्रलेख)


सकाळ वृत्तसेवा

संकटकाळी प्रत्यक्ष कृतीने जो मदत करतो, तो खरा मित्र, ही लोकोक्ती व्यक्तीप्रमाणेच राष्ट्राच्या जीवनातही महत्त्वाची असते. त्यादृष्टीने विचार केला, तर भारतापुढील राजनैतिक पातळीवरील आव्हानाची नेमकी कल्पना येऊ शकेल. पुलवामा येथील भीषण दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारे संदेश जगाच्या सर्व भागांतून येत आहेत, हे खरेच. सीमेपलीकडून करण्यात येत असलेल्या दहशतवादी कारवायांपासून स्वरक्षण करण्याचा भारताला अधिकार आहे, असे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी म्हटले आहे. चीननेही दहशतवादी कृत्यांचा निषेध केला. अमेरिका, रशिया, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, ग्रीस, बांगलादेश, श्रीलंका अशा अनेक देशांनी या हल्ल्याचा कडक निषेध नोंदविला आहे. पण, मुद्दा आहे तो कृतिशील साहाय्याचा. कळीच्या मुद्यावर निर्णायक भूमिका घेण्याचा. पाकपुरस्कृत दहशतवादाच्या विरोधातील लढाईसाठी असे मित्र किती पुढे येतील आणि पाकिस्तानवर दबाव आणण्यात थेट भूमिका बजावतील, हे पाहणे सर्वांत महत्त्वाचे आहे.

भारताच्या मुत्सद्देगिरीची कसोटी त्यात लागणार आहे. सर्वांत मोठे उदाहरण अर्थातच चीनचे आहे. प्रबळ आर्थिक, लष्करी सत्ता बनलेल्या या शेजारी देशाने दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असला, तरी मौलाना मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या ठरावावर घेतलेली आडमुठी भूमिका सोडण्याची तयारी त्या देशाने अद्याप तरी दाखविलेली नाही. अमेरिकेने दीर्घकाळ पाकिस्तानचा प्यादे म्हणून वापर केला. 9/11च्या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या दृष्टिकोनात काही प्रमाणात बदल झाला असला, तरी पाकिस्तानला एकाकी पाडण्याच्या उद्दिष्टात ते किती मनापासून हात देतील, याची शंका आहे.
अफगाणिस्तानात तालिबानशी वाटाघाटी केल्यामुळे त्या संघटनेला अप्रत्यक्ष का होईना, पण अधिमान्यता मिळाली आणि ज्या तालिबानला संपविण्यासाठी अमेरिकेने युद्ध सुरू केले, त्याविषयीच तडजोड केली. आता त्यातून पुढे जो धार्मिक मूलतत्त्ववाद उफाळून येईल, त्याच्या परिणामांची काळजी करण्यात सध्या तरी महासत्तेला स्वारस्य दिसत नाही; पण भारताला मात्र ही काळजी वाहावी लागणार आहे.

आपल्या भूमीवर भारतविरोधी दहशतवादी कारवायांना
सर्वतोपरी मदत पुरविण्याचे पाकिस्तानचे धोरण आणि या क्षेत्रात वाढणारा मूलतत्त्ववाद हा दुहेरी धोका आहे. शीतयुद्धाच्या काळात रशिया नेहेमीच भारताच्या बाजूने उभा राहिला, हे नक्कीच. परंतु, पाकिस्तानला एकाकी पाडण्याच्या प्रयत्नांत पुतीन यांचा रशिया निःसंदिग्ध भूमिका बजावेल, असे
खात्रीने सांगता येत नाही. त्यामुळे या सर्वच देशांच्या बाबतीत ठोस प्रयत्न भारताला करावे लागणार आहेत. आर्थिक कोंडी करण्याचा पर्याय सांगितला जातो आणि तो महत्त्वाचाही आहे. पाकिस्तानचा "विशेष अनुकूलता राष्ट्रा'चा दर्जा काढून घेऊन भारताने त्या दिशेने एक पाऊल उचलले. पण, हे एकट्यानेच करून भागत नाही. अमेरिकेने आर्थिक मदत रोखल्यानंतर सौदी अरेबिया आणि चीनने ती पाकिस्तानला पुरवली, हा अगदी अलीकडचा अनुभव. सौदी अरेबियाचे युवराज महम्मद बिन सलमान रविवारीच पाकिस्तानच्या भेटीवर आले असून, ते तालिबानशीही चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे.

अफगणिस्तानमधील नव्या रचनेच्या संदर्भात पाकिस्तानला दिल्या जात असलेल्या महत्त्वाबद्दल अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहेच. या सगळ्याच घडामोडी राष्ट्रीय हितसंबंधांच्या चौकटीतच जगाचा व्यवहार चाललेला आहे, याची जाणीव करून देतात. भारताला या वास्तवाकडे डोळेझाक करून चालणार नाही. भारताप्रमाणेच इराणमध्येही गेल्या आठवड्यात आत्मघातकी हल्ला झाला आणि त्यात इराणच्या "रिव्होल्युशनरी गार्ड'चे 27 सैनिक मृत्युमुखी पडले. या हल्ल्यामागे पाकिस्तानची फूस असल्याचा स्पष्ट आरोप इराणने केला असून, या पार्श्‍वभूमीवर भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्या देशाला दिलेली धावती भेट हे योग्य पाऊल म्हटले पाहिजे. या दोन देशांतील सहकार्य पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रभावी कसे ठरेल, हे आता पाहण्याची गरज आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्नांइतकाच; किंबहुना त्याहून महत्त्वाचा मुद्दा आहे तो देशांतर्गत आघाडीवरचा. काश्‍मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी आणि तेथे शांतता-स्थैर्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत राहावे लागणार नाही. त्यात यश मिळणे, हेही पाकिस्तानला चोख आणि परिणामकारक उत्तर असेल. ते मिळविणे सोपे नाही, हे खरेच; पण दहशतवाद्यांच्या कृत्यांमुळे पसरणारा हिंसाचाराचा वणवा हा सर्वसामान्य काश्‍मिरी जनतेच्या हिताचा नाही आणि त्यांच्या आर्थिक-राजकीय आकांक्षांनाही भस्मसात करणारा आहे, हे काश्‍मिरी जनतेला आणि त्यांच्या हितासाठी वेगवेगळे पक्ष वा संघटना चालविणाऱ्यांना पटवून द्यावे लागेल. त्यासाठी गरज आहे, ती प्रभावी राजकीय संवाद साधण्याची.

आंतरराष्ट्रीय पातळीवर राजनैतिक प्रयत्न जरूर करावेत; पण कोणावर विसंबून राहण्याचा गाफीलपणा करू नये. आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे आणि त्यासाठी आर्थिक, सामरिक सामर्थ्य वाढविण्याच्या सातत्याच्या प्रयत्नांना पर्याय नाही. याचे कारण आंतरराष्ट्रीय राजकारणातही चालते ते "शक्ती'चेच चलन.

या गावाचे सेनेशी ३०० वर्षांचे नाते


देशसेवा हे अनेकांचे ध्येय असते यामुळेच देशाच्या काना कोपऱ्यातील लहान मोठ्या गावातून अनेक जवान भारतीय लष्करात भरती होत असतात. जीवावर उदार होऊन हे जवान मातृभूमीसाठी शेवटचा श्वास घेईपर्यंत लढत राहतात. यात कोणताही धर्म, समुदाय अथवा जातपात याचा विचारही केला जात नाही. आंध्रप्रदेशातील माधवरम नावाचे एक चिमुकले गाव सेनेशी गेली ३०० वर्षे नाते जुळवून आहे. याची फारशी माहिती लोकांना नाही.


या गावाला सैन्याचा वारसा आहे. गोदावरी जिल्यातील या गावातील प्रत्येक घराचा सैन्याशी या ना त्या प्रकारे संबंध आहे. या गावातील सैनिकांना सुभेदार, कॅप्टन, मेजर अश्या त्याच्या हुद्द्यावरूनच बोलावले जातेच पण मुलांची नावेही तशीच ठेवली जातात. येथील प्रत्येक घराची कहाणी अलग आहे आणि ती मोठ्या अभिमानाने सांगितली जाते. एका रिपोर्ट नुसार १७ व्या शतकात गजपती राजवंशाचा राजा माधववर्मा याने हे गाव सैनिकांचे ठाणे म्हणूनच वसविले होते.


परिमाणी अनेक सैनिक येथे वस्तीला आले. या गावात खिळ्यापासून शस्त्रांपर्यंत सर्व साठा केला जात असे. पहिल्या जागतिक युद्धात येथील ९० सैनिक सामील होते तर दुसऱ्या महायुद्धात ही संख्या १ हजारवर गेली होती. या गावात सैनिक स्मारक आहे. माजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी या गावाची माहिती मिळाली तेव्हा तेथे मिलिटरी ट्रेनिंग सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि आता येथे डिफेन्स अॅकेडमी स्थापन करण्याचा विचार सरकार करत असल्याचे सांगितले जात आ

Army Welfare Fund Battle Casualties

Press Information Bureau
Government of India
Ministry of Defence
17-October-2016 18:22 IST


Army Welfare Fund Battle Casualties


             Of late, a large number of philanthropic organizations and individuals have been approaching in a benevolent gesture to assist  next of kins of battle causalities with monetary assistance. A surge of such requests come about post the Siachen avalanche where the Indian Army lost 10 brave soldiers.

           Post detailed deliberations, it was decided that donations/contributions would be accepted from such organizations and individuals through a separate and centralized fund focused for such a purpose. This would be in addition to the various existing schemes for the welfare of next of kins and children of battle casualties. The expenditure out of this fund towards welfare of families of the deceased soldiers will be undertaken as per approved procedures and laid down guidelines.

          Accordingly. Indian Army has opened a new bank account for welfare of bereaved families of Battle Casualties named “Army Welfare Fund Battle Casualties”.

          Organizations and individuals desirous of donating  to the cause may transfer the contribution directly in the account of “Army Welfare Fund Battle Casualties” as per the details of Bank Account given below :-

          Fund Name                   : Army Welfare Fund Battle Casualties.

          Bank Name                   : Syndicate Bank

          Branch                           : South Block, Defence Headquarters,

    New Dlehi- 110011. 

          Branch Code                  :  9055.

          IFSC Code                     : SYNB0009055.

          Account No                    : 90552010165915.

2

          Alternatively, the amount can also be forwarded through Cheque/Demand Draft in favour of “Army Welfare Fund Battle Casualties” payable at New Dlehi at the following address:-

          Director Accounts Section

          Adjutant General’s Branch

          Ceremonial & Welfare Directorate

          IHQ of MoD (Army)

          New Delhi-110011

          The contribution to the fund is purely voluntary in nature and the fund shall be exclusively used for the welfare of Next of Kins of Battle Casualties.

          In case of queries, the donor may contact the following at Army Headquarters:

Appointment Telephone No

(a)     Deputy Director General (Welfare)   011-2301 8112

Ceremonial & Welfare Directorate

          (b)     Director Accounts Section     011-2379 2382

Ceremonial & Welfare Directorate

          The proposal for obtaining approval from I.T. authorities in order to make the contribution eligible for tax exemption is under consideration.

Manoj Tuli

APRO (Army)

Pulwama encounter :चकमकीत मेजरसह ५ जवान शहीद


पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागात आज पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ५ भारतीय जवान शहीद झाले आहेत. शहिदांमध्ये एक मेजरचा समावेश आहे. पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने छेडलेल्या दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेअंतर्गत भारतीय जवानांनी आज पहाटे २ ते ३ दहशतवाद्यांना घेरले. त्या दरम्यान झालेल्या चकमकीत ५ भारतीय जवानांना वीरमरण आले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated:Feb 18, 2019, 09:16AM IST

Pulwama encounter :चकमकीत मेजरसह ५ जवान शहीद

काश्मीर

पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागात आज पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ५ भारतीय जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. शहिदांमध्ये एक मेजरचा समावेश आहे. पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने छेडलेल्या दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेअंतर्गत भारतीय जवानांनी मध्यरात्रीनंतर दहशतवाद्यांना सर्व बाजूंनी घेरले. त्या दरम्यान झालेल्या चकमकीत ५ भारतीय जवानांना वीरमरण आले. चकमकीदरम्यान एका नागरिकाचाही मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे.

ANI

@ANI

Jammu & Kashmir: 4 Army personnel including a Major killed in action, 1 injured during encounter between terrorists and security forces in Pinglan area of Pulwama district in South Kashmir

ANI

@ANI

Jammu & Kashmir: 4 Army personnel killed in action, 1 injured during encounter between terrorists and security forces in Pinglan area of Pulwama district in South Kashmir.


241

8:36 AM - Feb 18, 2019

Twitter Ads info and privacy

230 people are talking about this

पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराच्या ५५ राष्ट्रीय रायफल्स , सीआरपीएफ आणि एसओजीच्या जवानांनी मध्यरात्रीनंतर परिसराला घेरले. हे लक्षात येताच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करायला सुरू केले. यात मेजरसह ५ भारतीय जवान शहीद झाले. शहिदांमध्ये मेजर डी. एस. डोंडियाल, हेड कॉन्स्टेबल सावे राम, शिपाई अजय कुमार आणि शिपाई हरी सिंग यांचा समावेश आहे.
मात्र गेल्या तीन तासांपासून दोन्ही बाजूंनी गोळीबार बंद झालेला असून, भारतीय जवानांनी शोधमोहीम सुरूच ठेवली आहे. भारतीय जवानांनी घेरलेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मद याच संघटनेचेच आहेत. हे सर्व दहशतवादी आदिल अहमद डार याचेच सहकारी असल्याची माहिती मिळते आहे.
भारतीय जवानांनी पिंगलान परिसराला सर्व बाजूंनी घेरले आहे. दरम्यान, पुलवामा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याच आली आहे.
चारच दिवसांपूर्वी, १४ फेब्रुवारीला पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या बसवर आत्मघाती हल्ला केला होता. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. त्यानंतर भारतीय लष्कराला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र देण्यात आले.

पुलवामा हल्ला एकट्यादुकट्याचे काम नव्हे: माजी रॉ प्रमुख


जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेला आत्मघाती दहशतवादी हल्ला कोणा एकट्या दुकट्याचं काम नव्हे. या हल्ल्यामागे एक मोठा गट कार्यरत असण्याची दाट शक्यता आहे. सुरक्षेच्या पातळीवरचा ढिसाळपणाही या हल्ल्याला कारणीभूत आहे, अशी शक्यता रॉचे माजी प्रमुख विक्रम सूद यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated:Feb 17, 2019, 09:33PM IST

पुलवामा हल्ला एकट्यादुकट्याचे काम नव्हे: माजी रॉ प्रमुख

हायलाइट्स

  • सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेला आत्मघाती दहशतवादी हल्ला कोणा एकट्या दुकट्याचं काम नव्हे: रॉचे माजी प्रमुख विक्रम सूद
  • हल्ल्यामागे एक मोठा गट कार्यरत असण्याची दाट शक्यता : सूद
  • सुरक्षेच्या पातळीवरचा ढिसाळपणाही या हल्ल्याला कारणीभूत : सूद
  • पाकिस्तान आणि चीन एकमेकांचा फायदा पाहत आहेत. पाकिस्तानला पाठिंबा दिला तर पाकिस्तान चीनसाठी शिनजियांगमध्ये अडचणी निर्माण करणार नाही, हे चीनला पक्कं ठाऊक आहे: सूद

हैदराबाद:

जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेला आत्मघाती दहशतवादी हल्ला कोणा एकट्या दुकट्याचं काम नव्हे. या हल्ल्यामागे एक मोठा गट कार्यरत असण्याची दाट शक्यता आहे. सुरक्षेच्या पातळीवरचा ढिसाळपणाही या हल्ल्याला कारणीभूत आहे, अशी शक्यता रॉचे माजी प्रमुख विक्रम सूद यांनी व्यक्त केली.
भारताच्या रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (रॉ) मध्ये सूद यांनी तब्बल ३१ वर्षे सेवा केली. 'एक्स्टर्नल इंटेलिजन्स फॉर नॅशनल सिक्युरिटी' या विषयावरील एका कार्यशाळेत ते बोलत होते. 'सुरक्षा व्यवस्थेत कुठेतरी उणीव असल्याशिवाय एवढी मोठी घटना घडू शकत नाही. सीआरपीएफच्या जवानांच्या गाड्यांच्या हालचालीची संपूर्ण माहिती कोणीतरी दहशतवाद्यांना पुरवली. यामागे मोठा गट कार्यरत असण्याची शक्यता आहे,' असे ते म्हणाले.
भारताने या हल्ल्याला कसे प्रत्युत्तर द्यायला हवे, असे विचारता ते म्हणाले, 'ही कुठली बॉक्सिंगची मॅच नव्हे की ठोशास ठोसा लगावावा. पंतप्रधानांनी याबाबत सांगितले आहे की योग्य वेळ आणि ठिकाण सुरक्षा दल ठरवेल.' पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचा अतिरेकी मौलाना मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात येणाऱ्या अडचणींविषयी ते म्हणाले की 'चीन पाकिस्तानच्या सांगण्यावरून अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या आड येत आहे. कारण तसे न केल्यास शिनजियांग प्रांतातल्या इस्लामिक संघटना पाकिस्तानच्या दहशतवाद्यांशी संपर्क करू शकतात. पाकिस्तान आणि चीन एकमेकांचा फायदा पाहत आहेत. पाकिस्तानला पाठिंबा दिला तर पाकिस्तान चीनसाठी शिनजियांगमध्ये अडचणी निर्माण करणार नाही, हे चीनला पक्कं ठाऊक आहे.'

कुछ याद उन्हें भी कर लो...

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना रविवारी डोंगरे वसतिगृह मैदानावर नाशिककरांनी श्रद्धांजली अर्पण केली. देशरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांचे स्मरण करताना नागरिकांचे डोळे पाणावले. मेणबत्त्या पेटवून तसेच काही क्षण मौन धारण करून शहिदांना अभिवादन करण्यात आले.

१४ फेब्रुवारी रोजी काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या वाहनांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. यामध्ये ४० जवान शहीद झाले. या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध सुरू आहे. नाशिकमध्येही राजकीय पक्षांसह विविध संघटनांद्वारे शहीद सर्कल, हुतात्मा स्मारकासह ठिकठिकाणी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. रविवारी गंगापूर रोडवरील डोंगरे वसतीगृह येथे श्रद्धांजलीसाठी एकत्रित जमण्याचे आवाहन नाशिककरांना करण्यात आले होते. त्यानुसार सायंकाळी साडेसहापासूनच नागरिकांची पाऊले डोंगरे वसतिगृहाकडे वळू लागली. देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले होते. महिला, मुले आणि पुरूषांसह श्रद्धांजली वाहण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय होती. येथे शहिदांना अभिवादन करणारा फलक उभारण्यात आला होता. त्यासमोर पुष्पचक्र वाहून तसेच मेणबत्त्या प्रज्वलित करून नागरिकांनी अभिवादन केले. त्यानंतर आयोजकांच्या आवाहनानुसार सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली

Message from CPPC - BE ALERT

Quote

Pensioners

Message from CPPC

BE ALERT!!

CYBER CRIMINALS HAVE NOW TARGETED RETIRED PENSION HOLDERS!

THEY MAKE PHONE CALLS, EVEN IN LAND LINE,STATING THE PENSION HOLDER THAT HE HAS AN AMOUNT FOR RS. ###### /- LYING WITH S. G. I. FUND AND REQUESTING TO SEND SELF SIGNED COPY OF PAN, AADHAR, PHOTOCOPY OF 1ST PAGE OF PPO BOOK, ONE UNSIGNED CANCELLED CHEQUE WITH 2 COPIES PASSPORT SIZE PHOTOGRAPHS BY SPEED POST IN THE GIVEN ADDRESS SO THAT THE CASH CAN BE CREDITED DIRECTLY TO THE BANK.

THEY ALSO SHARE NAMES AND PHONE NUMBERS TO ESTABLISH THEIR GENUINENESS.

PLEASE SHARE WITH ALL RETIRED PERSONS YOU KNOW. BE CAREFUL.

Unquote

PENSION PAYING BANKS - RBI DIRECTIVE


RBI DIRECTIVE ON PENSION PAYMENT

SENIOR CITIZENS ABOVE 70, PLEASE NOTE

RBI has directed all banks to provide door-step services to all seniors 70 and above. This means you don't have to go in the pouring rain to the bank. The banks have to get wet coming to you !!
BANKS ARE KEEPING THIS UNDER WRAPS.

If your bank refuses to offer this service although you are above 70, then write a complaint to the RBI. Banks have benefited from us for years. Now let them do some work for you, while you sip coffee. If you are above 70 ! Here's the RBI circular:
https://m.rbi.org.in//Scripts/NotificationUser.aspx?Id=11163&Mode=0


                       You are  a government pensioner wondering if you can receive your pension in a joint
account or do you have to open a separate account to receive family pension? Did you know that banks have been asked to record the Pension Payment Order (PPO) number on the bank account passbook and that you can ask them to issue pension slips?

RBI DIRECTIVE

https://www.rbi.org.in/CommonPerson/english/Scripts/SrCitizen_Advertisement.aspx


AD BY RBI IN PAPERS

      To ensure that senior citizen pensioners of the government do not have to run from pillar to post to get their pension-related issues sorted, the Reserve Bank of India (RBI) has issued various directives to pension disbursing banks vide the master circular on this subject. The master circular was released on July 2, 2018.
       Knowledge of these instructions may help in getting your pension related problems resolved faster. Let us look at five issues commonly faced by pensioners
1. Credit of pension in a joint account
     Government employees who are about to retire or those who have already retired can have their pension credited to a joint bank account. However, this joint account must be operated with the spouse in whose favour an authorisation for family pension exists in the PPO. This means that you (i.e., the pensioner) cannot receive your pension in any other jointly held bank account except for the one held with your spouse whom you have nominated to receive family pension after your death.
       The savings bank account can be operated either on 'Former or Survivor' or 'Either or Survivor' based on the following terms and conditions:

i) After the credit of pension in the pensioner 's bank account, the government or bank will not be liable for wrongly withdrawn amount by the spouse.
ii) The bank must be informed of the death of the pensioner within a month. If any excess pension has been credited to the joint account post the death of the pensioner, then it shall be recovered from the joint account or any other account held by the pensioner/spouse either individually or jointly. Even the legal heirs, will be liable to refund any amount wrongly credited.
iii) If any arrears of pension is pending, the same will be credited to the joint account with the pensioner 's spouse .
iv) In case of death of the pensioner, the bank cannot insist that the spouse open new a bank account for the credit of family pension. The spouse can opt to receive family pension in the existing joint account.

2. Recording PPO in the bank's passbook
          RBI has advised pension paying banks to record the PPO number in the bank accounts of pensioners and family pensioners in which pension is credited . This will help pensioners avoid many problems which are generally faced in case of loss of the original PPO.
         PPO is an important document because government pensioners, including family pensioners, are required to mention this number while submitting life certificate in November every year. Non-  submission of life certificate to the pension paying branches can result in your pension being stopped.
         Other common problems include transfer of pension account from one bank/branch to another, commencement of family pension in case of demise of pensioner, and so on. Therefore, in case your PPO number is not recorded in your bank account, you can ask the pension-disbursing bank to do the same.
3. Update on of PPO and issue of pension slips
       Whenever there is change in the basic pension and/or dearness allowance (DA) to be credited to the pensioner/ family pensioner, the same nlust be intimated to them. The central bank has asked banks to call back and record the changes in the PPO held by the pensioner indicating the arnount of changes and effective date.
This means that whenever there is increase in DA, you can visit your bank and ask them to record and reflect the same changes in the PPO copy held by you. This will help you to know when and by how much the total amount of pension was increased.
       In addition to that, to keep pensioners updated regarding the change in the quantum of pension, the central government including defence and railways and state governments have decided to issue pension slips in this regard. Pensioners can request these slips from their pension paying branches.
These pension slips can help you keep a track record of the pension received by you, as \\'ell let you know from when you have received the benefit of higher pension either due to hike in DA or age benefit after the age of 80 years.
4. Nomination to receive pension arrears
       Government pensioners are required to nominate their heir (s) whc will receive tl1e arrears of pension from the government, if any, in the event of their death. To make the lives of pensioners easier, the central bank has advised bank branches to accept the nomination in Form A or B as the case may be.
       Fonn A issued by the pensioner to make a fresh nomination request. On the other hand, any modification in the existing nomination can be made via Form B as per rules governing nomination in this regard on the Ministry of Personnel, Public Grievances & Pensions website.
       Further, the RBI has also advised the pension paying banks that nomination made in this regard must also be printed on the front page the passbook of your bank account. These rules are also applicable to those receiving family pensioners.
S. Reducing the time lag to pay higher dearness relief
       To provide the benefit of higher dearness relief (DR) to the pensioners at the earliest, RBI in its master circular has given instructions to banks to reduce the time lag between the issue of order and payment of it. This will come as a relief to those senior citizen pensioners who would generally have to wait long -usually five to six months or sometimes even more to receive higher pension.
       According to the master circular, the central bank has advised all authorised banks dealing with government pensioners, to take necessary actions as mentioned in the various central and state government notifications in this regard without awaiting further instructions from them.
       The circular states that the pension paying bank branches should 1 act on the copies of the orders supplied by government to the head offices and/or regional offices of the authorised banks. It has further instructed head offices of the banks to closely monitor and supervise timely correct disbursement of government pension to eligible pensioner

Sunday 17 February 2019

https://bharatkeveer.gov.in/

https://bharatkeveer.gov.in/


Here is how you can make a donation

Go to bharatkeveer.gov.in

Click on Contribute To tab on the top and select Bharat Ke Veer Corpus Fund

On the new window that appears furnish your details and enter the security code provided below.

Provide the OTP sent to your mobile number

On the new screen provide your details including name, email id and the security code displayed below.

Enter the amount you want to donate


The trust also gives a donation certificate, enter details and click on contribute

A payment gateway opens furnish your account details and donate the amount


Apart from, contributing to the corpus fund one can also make a donation to individual soldiers who have laid the life in the service of the nation.




For Indian Army 2(Two) accounts are operated  for welfare of Ex Servicemen, Veer Naris & Battle Casualties & their dependents. Contribution to these are voluntary. These accounts are:-

1. Army Central Welfare Fund

Corporation Bank

Chandni Chowk

Delhi - 110006

ISFC Code - CORP0000205

Account Number - 520101236373338

PAN - AACAA7440H

(Income Tax Exempted)

2.  Army Welfare Fund Battle Casualties

Branch Name : Syndicate Bank

Branch : South Block, Defence Head Quarters,

New Delhi – 110011

Branch Code : 9055

IFSC Code : SYNB0009055

Account No : 90552010165915


राजकीय नेतृत्व सोपवेल ती कामगिरी निभावण्यास सज्ज : भारतीय हवाई दल प्रमुखांची ग्वाही

राजकीय नेतृत्व सोपवेल ती कामगिरी निभावण्यास सज्ज : भारतीय हवाई दल प्रमुखांची ग्वाही

पोखरण - पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय हवाई दलाने शनिवारी येथे जोरदार शक्तिप्रदर्शन घडवले. दरम्यान, राजकीय नेतृत्व सोपवेल ती कामगिरी निभावण्यास सज्ज असल्याची ग्वाही हवाई दल प्रमुख बी.एस.धनोआ यांनी दिली.

राजस्थानच्या पोखरणमध्ये हवाई दलाच्या वायूशक्ती या भव्य कवायतींचे उद्घाटन करताना धनोआ यांनी देशाला हवाई दलाच्या ताकदीची ग्वाही देशाला दिली. राष्ट्रीय सुरक्षेपुढील आव्हानांचा समर्थपणे मुकाबला करण्यास आणि देशाच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. कुठलीही मोहीम तडीस नेण्यासाठी आम्ही आघाडीवर राहू, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.

पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने पुलवामात घडवलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठीच्या पर्यायांची चाचपणी भारतीय सुरक्षा दलांकडून केली जात आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, धनोआ यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व आहे. दरम्यान, वायूशक्तीच्या माध्यमातून भारतीय हवाई दलाने पाकिस्तान सीमेलगत आपल्या शक्तीचे दर्शन घडवले. संबंधित कवायतींमध्ये लढाऊ जातीच्या सुमारे 140 विमानांनी, हेलिकॉप्टर्सनी भाग घेतला. यावेळी क्षेपणास्त्रांच्या ताकदीचेही प्रदर्शन घडवण्यात आले.

पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी सरकारने सैन्याला दिली परवानगी

टीम महाराष्ट्र देशा – ‘सुरक्षा दलांना पुढील कारवाई करण्यासाठी वेळ काय असेल, जागा आणि स्वरुप काय असेल हे निश्चित करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. अशा प्रकारचे हल्ले करून भारताला उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे. पण त्यांचे हे मनसुबे देशातील १३० कोटी जनता एकत्रितपणे उधळून लावेल. त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल,’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.

काल दुपारी ३:२५ वाजता जैश - ए - मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. तब्ब्ल २०० किलो वजनाच्या स्फोटकांनी भरलेली चार चाकी सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर धडकावली. यामध्ये ४२ जवान शाहिद झाले असून २० जवान जखमी झाले. गेल्या दोन दशकातला हा सर्वात मोठा हल्ला होता.

झाशीमध्ये बोलताना नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला. देशाच्या सैनिकांनी आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती दिली आहे . त्यांचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही अशी नरेंद्र मोदींनी देशाला ग्वाही दिली.

पुलवामा : लष्कराचा ताफा जाताना सामान्य वाहतूक रोखणार - राजनाथ सिंह


काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर शुक्रवारी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली.

हल्ल्यात प्राण गमावलेल्या जवानांना श्रद्धांजली दिल्यानंतर आणि त्यांच्या पार्थिवाला खांदा दिल्यावर ते बोलत होते. पीडित कुटुंबियांची प्रत्येक प्रकारे मदत केली जाईल, असं त्यांनी सांगितलं आहे.

सर्व मोठ्या अधिकाऱ्यांशी बोलणी केल्यानंतर त्यांनी योग्य कारवाईचे आदेश दिले आहेत. आमच्या लष्कराचं मनोधैर्य प्रबळ आहे आणि दहशतवादाविरोधात आपला जो लढा सुरू आहे त्यात आपल्याला यश नक्की मिळेल, असं राजनाथ सिंह म्हणाले.

"सीमेपलीकडून जे लोक दहशतवाद पसरवण्याचं काम करत आहे त्यांचे मनसुबे कधी पूर्ण होणार नाहीत. सीमेपलीकडील जहालवादी संघटना आणि ISI यांच्यासोबत इथल्या काही संघटनांचं साटंलोटं आहे आणि त्यामुळे जम्मू काश्मीरच्या जनतेचं भवितव्य धोक्यात येऊ शकतं."

काश्मीरमधील फुटीरतावादी संघटनांचे नाव न घेता ते म्हणाले, पाकिस्तान आणि ISI कडून पैसे घेणारे काही घटक या ठिकाणी आहेत. पाकिस्तान आणि ISI कडून पैसे घेणाऱ्या लोकांना मिळालेल्या सुरक्षेचं अवलोकन व्हायला हवं.

जेव्हा काश्मीरमधून लष्कराचचा ताफा जाईल तेव्हा सर्वसाधारण ट्राफिक थांबवलं जाईल, असंही ते म्हणाले.

राजनाथ सिंह यांनी शांततेसाठी आवाहन केलं आहे. "अशा वेळी धार्मिक तणाव वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. असा प्रयत्न करू इच्छिणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल."

हल्ल्यात जखमी झालेल्या सैनिकांना त्यांनी रुग्णालयात जाऊन भेट दिली.

Omar Abdullah

@OmarAbdullah

Sir, why not use special chartered trains between Banihal & Baramulla for movement of security forces? They will be able to move at high speed nonstop & they will be much safer than convoys. Also highways will be available for civilian traffic.

ANI

@ANI

HM Rajnath Singh in Srinagar: In the wake of suicide attack on CRPF convoy y'day, it has been decided that the civilian movement will be stopped for sometime when a large convoy of security forces passes through an area. Civilians will face a little difficulty,we apologise for it

View image on Twitter

2,188

5:42 PM - Feb 15, 2019

Twitter Ads info and privacy

875 people are talking about this

तर ओमर अब्दुल्ला यांनी मात्र सैन्याच्या तफ्याच्या प्रवासावेळी सामान्य वाहतूक रोखण्यापेक्षा रेल्वेचा वापर करावा असा सल्ला राजनाथ सिंह यांना दिला आहे.

दरम्यान या हलल्यात ठार झालेल्या जवानांची संख्या 46 वर गेली आहे. जैश-ए-मोहम्मद या जहालवादी संघटनेनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

View image on Twitter

View image on Twitter

ANI Digital

@ani_digital

India lodged a strong protest against Pakistan as its High Commissioner to India, Sohail Mahmood, was summoned by Foreign Secretary Vijay Gokhale in connection with the Pulwama terror attack
Read
@ANI Story | https://www.aninews.in/news/world/asia/pulwama-terror-attack-india-lodges-protest-pak-hc-summoned-by-mea20190215144024/ …

294

3:02 PM - Feb 15, 2019

72 people are talking about this

Twitter Ads info and privacy

या हलल्या नंतर भारतानं पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना कडक शब्दांत समज दिली आहे.

परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पाकिस्तानचे उच्चायुक्त सोहेल महमूद यांना शुक्रवारी दुपारी दोन वाजता परराष्ट्र मंत्रालयात बोलावून ही समज दिली.

त्यावेळी गोखले यांनी पुलवामा हल्ल्याचा पाकिस्तानशी असलेल्या संबंधांवरून महमूद यांची कानउघडणी केली. पाकिस्ताननं जैश-ए-मोहम्मदविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.

अशा कुठल्याही संघटनेला खतपाणी घालू नये तसंच या संघटनांना पाकिस्तानच्या भूमीवरून हालचाली करू देऊ नये, असं परराष्ट्र सचिवांनी महमूद यांना सांगितलं.

राजनाथ सिंह घेणार बैठक

गृहमंत्री राजनाथ सिंह हे सुरक्षेचं अवलोकन करण्यासाठी एक बैठक घेणार आहेत. त्याचबरोबर ते फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि केंद्रीय एजन्सीच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहेत.

या हल्ल्याच्या तपासात सरकार काही कमी पडू देणार नाही, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

सरकारने सुरक्षा दलांसाठी निर्देश दिला आहेत की लष्करानं आपला ताफा वेगळ्या मार्गाने घेऊन जाऊ नये. दक्षिण काश्मीरमध्ये इंटरनेट बंद करण्यात आलं आहे आणि श्रीनगरमध्ये इंटरनेट स्पीड कमी करण्यात आला आहे.

फुटीरतावादी नेत्यांनी केला हल्ल्याचा निषेध

फुटीरतावादी नेते सैय्यद अली शाह गिलानी, मीरवाइज उमर फारूक आणि यासीन मलिक यांनी सैनिकांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.

काश्मीरमधील फुटीरतावादी संघटना जॉइंट रेसिस्टन्स लीडरशिप (JRL) नं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं की, "आम्ही आमच्या तरुणांच्या शवपेट्या रोज उचलतो. मृतांच्या कुटुंबीयांची स्थिती कशी असेल याचा आम्हाला अंदाज आहे. आम्ही त्यांचं दुःख समजू शकतो. हिंसा आणि प्रतिहिंसा थांबल्यानंतर काश्मीर वादाचं समाधान शक्य आहे."

चीनची प्रतिक्रिया

जैश-ए-मोहम्मदच्या म्होरक्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास चीनने पुन्हा एकदा नकार दिला आहे.

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात यावं असा प्रस्ताव भारतानं संयुक्त राष्ट्रांमध्ये केला आहे. त्या प्रस्तावावर सही करण्यास चीनने नकार दिला आहे.

पुलवामा हल्ल्याने आम्हाला जबर धक्का बसला असल्याचं चीननं म्हटलं आहे.

मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करायचे की नाही या प्रश्नाला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं की अशा प्रस्तावांवर विचार करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. याबाबतीत या समितीचा निर्णय अंतिम राहील.

जम्मूमध्ये हिंसा

हल्ल्च्या घटनेनंतर जम्मूच्या काही भागंमध्ये लोकांनी विरोध आणि निदर्शनं केली. काही ठिकाणी जाळपोळ सुद्धा करण्यात आली. त्यामुळे जम्मूच्या काही भागांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसंच काही भागात लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे.

स्थानिक पत्रकार मोहीत कंधारी यांनी सांगितलं, डिव्हिजनल कमिश्नर संजीव वर्मा म्हणाले की स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसे पोलीस तैनात करण्यात आले आहेत. जम्मू शहर आणि बाहेरच्या भागात तणाव निर्माण झाल्याने कर्फ्यू लावण्यात आला आहे.

अधिकारी आणि घटनेच्या साक्षीदारांनी सांगितलं की शुक्रवारी मुस्लीमबहुल भागात पार्किंगमध्ये ठेवण्यात आलेल्या गाड्यांना पेटवण्यात आलं.

अग्रलेख- हलगर्जीपणाची किमंत


काश्मीरमधील दहशतवाद्यांचा खात्मा केला जात आहे. दहशतवादमुक्त जिल्हे होत आहेत. आता फक्त दोनशे अतिरेकी उरले आहेत, असे दावे केंद्र सरकार करीत असताना देशाच्या इतिहासातला सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला काश्मीरमध्ये व्हावा, ही दुर्दैवाची बाब आहे. दोन वर्षांपासून जिल्हावार दहशतवाद्यांचे आकडे दिले जात असताना तसेच आयएसआय, लष्कर-ए-तैयब्बा यांच्यावर लक्ष केंद्रीत केले जात असताना दुसर्‍या दहशतवादी संघटना सक्रीय झाल्या आहेत, याकडे दुर्लक्ष करण्यात आले, त्याची मोठी किमंत गुरूवारच्या हल्ल्याने मोेजावी लागली. त्यातही नियमांना बगल देत लष्कराच्या हालचाली केल्याचा परिणाम अशा हल्ल्यात होतो. वास्तविक एकाच वेळी लष्कराच्या किंवा केंद्रीय सीमी सुरक्षा दलाच्या तुकड्यांचे स्थलांतर करू नये, असा नियम आहे. शिवाय त्याबाबत कमालीची गुप्तता पाळली जावी, असा संकेत आहे. लष्कराचा ताफा जात असलेल्या भागाची तपासणी केल्याशिवाय ताफा पुढे नेऊ नये, असा ही नियम आहे. त्यातही धक्कादायक म्हणजे, गुप्तचर विभागाने 8 फेब्रुवारी रोजी आईडी हल्ल्याची शक्यता व्यक्त करून काळजी घेण्याची सूचना केली होती. ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय सीमा सुरक्षा दलाचा एवढा मोठा ताफा एका ठिकाणाहून दुसरीकडे हलविणे जोखमीचे होते. सुरक्षा यंत्रणा दिमतीला असली, तरी अलीकडच्या काळात सीरिया, अफगाणिस्तान तसेच युरोपमध्ये जे आत्मघाती हल्ले झाले, ते लक्षात घेऊन पुरेशी तपासणी आणि सर्वती काळजी घेऊन ताफ्याचे स्थलांतर करणे आवश्यक होते. जम्मू काश्मीर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी एका खासगी ट्विटर अकाऊंटवर अपलोड करण्यात आलेली गुप्त सूचना सुरक्षा यंत्रणांना दिली होती. त्यामध्ये पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने सुरक्षा दलावर आत्मघातकी हल्ला करण्याची धमकी दिली होती. त्यामध्ये, एका ट्विटर अकाऊंटवरून अपलोड करण्यात आलेला एक केवळ 33 सेकंदाचा व्हिडिओ आहे. ज्यामध्ये दहशतवादी सोमालियात जवानांवर हल्ला करताना दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे, या व्हिडिएओत ज्या पद्धतीने दहशतवादी हल्ला होताना दिसतो आहे, तसाच हल्ला गुरूवारी दक्षिण काश्मीरच्या पुलवामात सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणार्‍या एका बसवर करण्यात आला. हल्ल्याअगोदरच्या घटना पाहिल्या, तर छोट्या छोट्या गोष्टींकडे कानाडोळा केल्याची किमंत जवानांच्या बलिदानांत मोजावी लागते, हे स्पष्ट झाले. पूर्वींच्या घटनांतून किंवा सूचक इशार्‍यातून आपण काहीच शिकत नाही, हे त्यातून सिद्ध झाले.

जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय सीमा सुरक्षा दलाच्या तुकडीवर गुरुवारी झालेल्या हल्ल्यात 40 हून अधिक जवानांना प्राण गमवावे लागले. काश्मीर प्रश्‍नाचे जाणकार आणि संरक्षणतज्ज्ञ या हल्ल्याला भारत सरकारचे सर्वात मोठे अपयश असल्याचे मानतात. अशा प्रकारचा मोठा हल्ला म्हणजे कट्टरवाद्यांना संपवण्यात आलेले अपयश स्पष्टपणे आधोरेखित करते. शिवाय असा हल्ला काश्मीर प्रश्‍न आणखी गुंतागुंतीचा करू शकतो. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी वेळोवेळी असा दावा केला, की काही दिवसांत काश्मीरमधील कट्टरवादी कायमचे नष्ट होतील; मात्र तसे झाले नाही. काश्मीरमधील स्थिती आणखी खराब होताना दिसत आहेत. लष्कराचा काश्मीरमध्ये झालेला वापर आणि तशा पद्धतीची रणनीती ही स्थिती सांभाळण्यात अपयशी ठरल्याचे दिसते. काश्मीरमधील परिस्थिती सामान्य आहे, असे म्हणता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठ दिवसांपूर्वीच काश्मीरचा दौरा करून अनेक बाबतीत मतप्रदर्शन केले होते; परंतु अटलबिहारी वाजपेयी यांनी जसा काश्मीरवासीयांचा विश्‍वास संपादन केला होता, तसा विश्‍वास मोदी यांना संपादन करता आला नाही. उलट, गेल्या साडेचार वर्षांत घेतलेल्या उलट सुलट भूमिकांमुळे काश्मीरमधील राजकारणी, उद्योजक, सामान्य जनता ही गोंधळलेली होती. काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासारखे काही घडले नाही. बुर्‍हाण वाणी चकमकीत मारला गेल्यानंतर हिज्बुल मुजाहिदीनच्या अन्य अतिरेक्यांचाही खात्मा करण्यात आला. दहा अतिरेकी मारले गेले, म्हणजे काश्मीरमध्ये अन्य नावांनी अतिरेकी कारवाया करणारच नाहीत, असा समज कदाचित सरकारने करून घेतला गेला असावा. फुटीरतावाद्यांविषयी सहानुभती असलेल्या पीडीपीबरोबर तीन वर्षे संसार करताना त्यांच्या बाबत ब्र शब्दही न काढलेल्या भाजपने अचानक पाठिंबा काढून घेताना मात्र त्यांच्या काळात दहशतवादाला आळा घालण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवला. आता पाच महिने अगोदर राज्यपाल राजवट आणि नंतर राष्ट्रपती राजवट लागू असताना दहशतवाद का कमी झाला नाही, याचे उत्तर मिळत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये दहशतवाद्यांचे आत्मघातकी हल्ले जवळपास बंद झाले होते. त्यामुळे असे हल्ले होणार नाहीत, असे गृहीत धरून आपण बेसावध राहिलो. दहशतवादी मात्र अशा संधीची वाट पाहत होते. काश्मीरमधील संघर्ष हा गोळीला गोळीने प्रत्युत्तर देऊन संपणारा नाही. तसेच तो एक-दोन महिन्यात संपून जाणारा नाही. जेव्हापासून या लढाईत वहाबी मुस्लिम तरुण जास्त प्रमाणात उतरले आहेत, तेव्हापासून काश्मिरातील लढाई आणखी अवघड झाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून काश्मिरी तरुण 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया' (इसिस) तसेच वहाबी विचारधारेकडे आकृष्ट होत आहेत. त्यात उच्चशिक्षितांचे प्रमाणही जास्त आहे. ही स्थिती सर्वात चिंताजनक आहे. भारत सरकारला त्याकडे गांभीर्याने पाहावे लागेल. यावर वेगळा उपाय शोधावा लागेल. भारत सरकारला काश्मीरमधील तरुणांशी, लोकांशी संवाद साधावा लागेल. जे लोक नाराज आहेत, त्यांच्याशीही बोलावे लागेल. दहशतरवाद्यांपासून दूर आहेत, अशा लोकांशी संवाद वाढवायला हवा; परंतु त्याबाबतीत नेमके सरकार कमी पडते आहे. वाटाघाटीचे, चर्चेचे दरवाजे बंद केले, तर त्यातून काहीच साध्य होत नाही. याबाबतीत तरी वाजपेयी यांचा आदर्श घ्यायला हवा. जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबासारख्या अतिरेकी संघटनांच्या विचारधारांना काश्मिरी तरुण बळी पडताना दिसत आहेत. त्यांना आत्मघातकी हल्लेखोर बनवले जाते आहे. काश्मिरी युवकांना रोजगार आणि सन्मान मिळाला, की ते दहशतवादापासून दूर जातील. शाळकरी वयापासून त्यांंच्या आणि पालकांच्याही समुपदेशनावर भर द्यायला हवा. विकास प्रक्रियेचे आपण भागीदार आहोत, याचा विश्‍वास त्यांना वाटला आणि काश्मीरमध्ये विकासाचे पर्व सुरू आहे, असे दिसले, तरी युवक दहशतवादापासून दूर राहतील. जवानांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली की नाही, हे यावर चर्चा करण्यापेक्षाही ही घटना का आणि कशी झाली याची चौकशी झाली पाहिजे. गुरूवारचा हल्ला दहशतवाद्यांना प्रोत्साहनासारखा ठरेल. गेल्या दोन वर्षांत या भागात लष्कराने कडक कारवाया केल्या आहेत. सुरक्षा दलांनी जवळपास 500 हून अधिक दहशतवाद्यांना ठार केल्याचे सांगितले जाते आहे.
काश्मीर खोर्‍यातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये काही वर्षांमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या कारवाया लक्षणीय प्रमाणात वाढल्या आहेत. पाकिस्तानातूनही काश्मीर खोर्‍यामध्ये घातपात करण्यासाठी जैश-ए-मोहम्मदला मदत करण्यात येत आहे. जैश-ए-मोहम्मदच्या कारवायांमध्ये वाढ झाल्याचे काश्मीर खोर्‍यामध्ये कार्यरत सुरक्षा अधिकार्‍यांनीही मान्य केले आहे. तसेच, जैश-ए-मोहम्मदच्या कारवायांमध्ये स्थानिक मदतही होत असून, या संघटनेमध्ये स्थानिक तरुण सहभागी होत असल्याकडे काही तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. पुलवामा जिल्ह्यामध्येच गेल्या वर्षी जानेवारीमध्ये जैश-ए-मोहम्मदने 'आईडी'चा स्फोट घडवला होता. त्यामध्येही केंद्रीय राखीव पोलिस दलाचे पाच जवान हुतात्मा झाले होते. 'आईडी'चा वापरही गेल्या वर्षीच करून जैश-ए-मोहंमदने आपले इरादे दाखवून दिले होते. आपणच त्याकडे फारशा गांभीर्याने पाहिले नाही. पठाणकोट असो, की अवंतीपुरा; या दोन्ही हल्ल्यामागची संघटना पाहिली, त्यांची कार्यपद्धती पाहिली, तर असे आत्मघाती हल्ले होणार नाहीत, अशी काटेकोर व्यवस्था आपल्याला करावी लागेल. विकास, चर्चा आणि त्याचवेळी दहशतवाद्यांविरोधात कारवाई अशा त्रिसूत्रीचा वापर केला, तर त्या त्यांची कार्यपद्धती पाहिली, तर असे आत्मघाती हल्ले होणार नाहीत, अशी काटेकोर व्यवस्था आपल्याला करावी लागेल. विकास, चर्चा आणि त्याचवेळी दहशतवाद्यांविरोधात कारवाई अशा त्रिसूत्रीचा वापर केला, तर त्यातून मार्ग निघू शकतो.

Dailyhunt

लेख : ईशान्येतील वाढत्या चिनी कारवाया


>>ब्रिगेडियर हेमंत महाजन<<

चीनच्या दबावास भीक न घालता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशला 9 फेब्रुवारी रोजी भेट दिली. त्यावर चीनने घेतलेला आक्षेप आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने धुडकावून लावला हे योग्यच झाले. हिंदुस्थानी पंतप्रधानांच्या अरुणाचल भेटीस आक्षेप घेणे हे चीनचे नेहमीचेच आहे. चीन अरुणाचल प्रदेशाला दक्षिण तिबेट मानतो आणि तो आपल्याच देशाचा भाग आहे, असे त्याचे म्हणणे आहे. आपण चीनशी या सीमेसंदर्भात 21 वेळा चर्चा केली आहे. पण चीन अरुणाचलचा हेका सोडायला तयार नाही. चीनच्या या विस्तारवादास ठामपणे विरोध करत राहणे हाच एक मार्ग आहे.

देशाला भेडसावणाऱया अंतर्गत सुरक्षेच्या प्रश्नांमध्ये ईशान्य हिंदुस्थानातील बंडखोरी हा एक महत्त्वाचा पैलू आहे. गेल्या चार वर्षांमध्ये ईशान्य हिंदुस्थानातील बंडखोरी आणि तिथला हिंसाचार फारच कमी झाला आहे. मात्र चीन आणि पाकिस्तान हे तेथील बंडखोरी वाढवण्याचा आता प्रयत्न करत आहेत. त्यात मुख्य भूमिका निभावत आहे तो परेश बरुआ आणि त्यांची दहशतवादी संघटना युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम. बांगलादेशी घुसखोरी ही आसाम आणि ईशान्य हिंदुस्थानात प्रचंड मोठय़ा प्रमाणात वाढली होती. ती थांबवण्यासाठी ही संस्था निर्माण झाली. आसाम गण परिषद यांचीच एक संलग्न संस्था होती. त्यांनी बांगलादेशी घुसखोरी थांबवण्यासाठी दहशतवाद सुरू केला. या संघटनेचे तळ आणि प्रशिक्षण केंद्रे सुरुवातीला चीनमध्ये होती. चीनने हाकलून देत त्यांना बांगलादेशात तळ ठोकायला भाग पाडले. बांगलादेशामध्ये हसीना वाजेद यांचे सरकार आल्यापासून त्यांना दम देऊन जी दहशतवादी कृत्ये युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम-बांगलादेशी घुसखोरांविरोधात करत होती ती थांबवण्यास भाग पाडली. शेवटी ते बांगलादेशातील तळ हलवून म्यानमारमध्ये गेले. आता ही संघटना घुसखोरांविरुद्ध न बोलता ईशान्य हिंदुस्थानात स्थायिक झालेल्या किंवा कामासाठी आलेल्या इतर हिंदुस्थानींविरुद्ध हिंसाचार करते. काही महिन्यांपूर्वी उल्फाच्या बंडखोरांनी सहा बिहारी लोकांना मारले होते.

अर्थात आपल्या सैन्याने केलेल्या अभियानामुळे ईशान्य हिंदुस्थानमध्ये असलेल्या इतर दहशतवादी गटांची क्षमता फारच कमी झालेली आहे. तिथे दोन मोठे गट आहेत. पहिला म्हणजे एनएससीएन खपलांग जो हिंदुस्थान सरकारविरुद्ध अजूनही कारवाया करू इच्छितो. त्यांचा नेता खपलांग याचा गेल्या वर्षी मृत्यू झाला. त्याच्या जागी कोनयाक हा हिंदुस्थानी नागा आला. हा हिंदुस्थानी नागा वाटाघाटीकरिता तयार होता म्हणून एमएससीएनकेने त्याला काढून टाकत त्याच्या जागी याँग औग या म्यानमारी नागाला मुख्य बनवले. त्याने पुन्हा एकदा हिंदुस्थानविरोधात बंडखोरी करायचे ठरवले आहे. चीनने परिस्थितीचा फायदा घेत नागा बंडखोर आणि मणिपूरमधील बंडखोर गट त्यांना उल्फाच्या बरोबर एकत्र येऊन एक संयुक्त दहशतवादी संस्था स्थापन करण्यास भाग पाडले आहे. त्याचे नाव आहे युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ वेस्टर्न साऊथ ईस्ट एशिया (यूएनएलएफडब्ल्यू). ही संस्था ईशान्य हिंदुस्थानातील सर्वच बंडखोर गटांना उल्फाच्या नेतृत्वाखाली आणून हिंदुस्थानविरोधात बंडखोरी करण्यास भाग पाडत आहे.

आताच हिंदुस्थान सरकारने ठरवले आहे की, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सप्रमाणे पकडल्या गेलेल्या घुसखोर बांगलादेशी नागरिकांमध्ये बांगलादेशातून आलेले हिंदू आणि इतर अल्पसंख्याक ख्रिश्चन, बौद्ध यांना हिंदुस्थानी नागरिक बनवणार आहे. हे कारण पुढे करून या गटांनी हिंदुस्थानविरोधात हिंसाचार करायचे ठरवले आहे. ईशान्य हिंदुस्थानातील हिंसेच्या आकडेवारीकडे पाहिल्यास 2014 सालाआधी प्रत्येक वर्षी 350 ते 500 सुरक्षाकर्मी, बंडखोर आणि सामान्य नागरिक मारले जात. 2018 मध्ये ही संख्या 50 हून कमी झाली आहे. म्हणजेच हिंसाचारात लक्षणीय घट झाली आहे. मात्र आता सर्व दहशतवादी संघटनांना एकत्र करून हिंसाचार वाढवण्याचा चीनचा कुटील डाव आहे. यामध्ये सामील आहेत ते उल्फा, नागालँडचा खपलांग समूह, नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँड आणि मणिपूरमधील काही दहशतवादी गट जसे पीपल्स रिह्युलन्स पार्टी, कम्युनिस्ट पार्टी इत्यादी आहेत.

यापैकी बहुतेक संघटनांचे तळ म्यानमारमध्ये आहेत, परंतु म्यानमारमधील सरकारने आता खपलांग गटाशी शांतता चर्चा केल्याने ते आता म्यानमारविरुद्ध कारवाई करणार नाहीत. ते केवळ हिंदुस्थानविरुद्धच दहशतवादी कृत्ये करण्यासाठी वापरले जाणार आहेत. चीनच्या मदतीने त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा आपला आवाज उठवण्यासाठी तयारी केली आहे. या समूहाची लढण्याची क्षमता 200 ते 300 दहशतवादी इतकी असू शकते. त्यांनी ईशान्य हिंदुस्थानमध्ये बंडखोरी सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये त्यांना थेडेफार यश मिळाले आहे.

हिंदुस्थानने चीनशी संवाद साधत परेश बरुआ या उल्फाच्या प्रमुखाला हिंदुस्थानच्या स्वाधीन करावे असे सांगितले होते. मात्र चीनने नकार दिला आहे. उलट कम्युनिस्ट पक्ष माओवादी दहशतवादी संघटना मध्य हिंदुस्थानात दहशतवादी हल्ले करते. चीन माओवादी आणि ईशान्य हिंदुस्थानातील दहशतवादी संघटनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. हिंदुस्थानविरोधी गट एकत्र येतात तेव्हा त्यांची प्रशिक्षण देण्याची आणि शस्त्रसाधने, युद्ध सामग्री देण्याची क्षमता आणि आर्थिक क्षमता वाढते.

गेल्या महिन्यात ब्रह्मपुत्रेवरील चौथ्या मोठय़ा पुलाची निर्मिती गेल्या चार वर्षांत पूर्ण झाली आहे. त्याचे नाव बोगिबिल. ईशान्य हिंदुस्थानातील दळणवळण साधनांची निर्मिती वेगवान आणि उत्कृष्टपणे केली जात आहे. त्यामुळे आर्थिक प्रगतीला मोठा वाव ईशान्य हिंदुस्थानमध्ये मिळणार आहे. मात्र हीच गोष्ट नको असल्याने ईशान्य हिंदुस्थानची ही प्रगती थांबवण्यासाठीच हिंदुस्थानचे शत्रुदेश चीन आणि पाकिस्तान ईशान्य हिंदुस्थानात पुन्हा हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. हिंदुस्थानी सैन्य याविरोधात आक्रमक कारवाया करून हिंसाचार करण्याआधीच त्यांना नेस्तनाबूत करण्यामध्ये किंवा पकडण्यात यश मिळवेल. यासाठी उत्कृष्ट गुप्तहेर माहितीचीसुद्धा गरज आहे. टेक्निकल इंटेलिजन्सचा वापर करून अशा गटांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे हिंसाचार होण्याआधी बंडखोर गटांवर हल्ला करून हिंसाचार आधीच थांबवता येईल.

त्या' चेकपोस्ट सुरू असत्या तर घटना घडली नसती..सीआरपीएफचे माजी अधिकारी राणा यांची खंत


नाशिक -ठिकठिकाणी पूर्वीप्रमाणे चेकपोस्ट राहिल्या असत्या तर कदाचित ही घटना टळली असती. पुलवामामध्ये गुरुवारी झालेल्या आत्मघातकी हल्ल्याच्या कारणांचा शोध घेतला जात असताना श्रीनगरमध्ये केंद्रीय राज्य राखीव दलात १३ वर्षे उच्च पदावर जबाबदारी सांभाळलेले आणि तब्बल ३३ वर्षे विशेष सुरक्षा दलात शाैर्य गाजवलेले अॅड. दिलीपसिंग राणा यांनी माध्यमांना ही माहिती दिली.

श्रीनगरपासून ते काझीगुंडपर्यंत पूर्वी अनेक चेकपोस्ट होत्या. त्यामुळे कोणीही तेथे संपूर्ण तपासणीशिवाय येणे शक्य होत नव्हते. काही वर्षांपूर्वी श्रीनगर येथील पंथ चौकाजवळ एका भरधाव वाहनाबाबत संशय आल्यानंतर चेक पोस्टवरील एका जवानाने टायरवर गोळी झाडून ती गाडी थांबवली होती. मात्र वाहनात स्थानिक नागरिक होते. हे प्रकरण थेट न्यायालयापर्यंत गेले आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी गोळी झाडणाऱ्या जवानाविरुद्धच खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला. याच संवेदनशील प्रकरणाची दखल घेत स्थानिक सरकारने या ठिकाणी असलेल्या सर्व चेक पोस्ट हटवल्या. या निर्णयास तेव्हाही तीव्र शब्दांत सैन्य दलाने विरोध केला होता. मात्र तत्कालीन सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले होते. तेव्हापासून तेथे वाहनांची कसून तपासणी होत नाही. त्यामुळे पुलवामापर्यंत सहज वाहन घेऊन जात हल्ला करणे दहशतवाद्यांना सोपे गेले, असे राणा यांनी सांगितले.

स्थानिकांशी संपर्क महत्त्वाचा
आपल्या कार्यकाळातही असाच कट दहशतवाद्यांनी अनेकदा आखला. मात्र, श्रीनगरच्या रहिवाशांशी असलेल्या संबधांमुळे हल्ल्यापूर्वीच माहिती मिळून आम्ही सजग व्हायचो. त्यामुळे अनेक हल्ले होण्यापूर्वीच त्याची माहिती मिळत असे. म्हणून जवानांनी स्थानिक लोकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवायला हवेत, असे राणा म्हणाले.

पुलवामा : तरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे - विश्वास नांगरे पाटील


टीम महाराष्ट्र देशा – देशातील सुरक्षा जवानांवर झालेला झालेला हल्ला हा आजपर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. त्यांच्या कुटूंबियांच्या दु:खात आपण सर्वजन सहभागी आहोत. शत्रूवर आक्रमण आणि भारतीय शहिदांच्या बलिदानाचा बदला घेण्यासाठी तरूणांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यदलात दाखल व्हावे, असे आवाहन विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केले आहे.

काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यातील सीआरपीएफच्या शहीद जवानांना कोरेगावच्या डी. पी. भोसले महाविद्यालयात श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण केली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत होते. या वेळी नांगरे पाटील व अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या हस्ते अमर जवान स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रेरणा कट्टे, पोलिस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा एन.सी.सी. विभागप्रमुख प्रा. ले. बाळकृष्ण भोसले, कोरेगाव शहरातील सोनेरी ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, छात्रसेनेचे कॅडेट व विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते. डॉ. विद्या नावडकर यांनी सूत्रसंचालन केले.

मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या 'या' निर्णयामुळे 40 जवान शहीद ?


श्रीनगर : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये लष्कराचे 40 जवान शहीद झाले. यानंतर देशभरात शोककळा पसरली आणि सर्वत्र संतापाची लाट उसळली. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा आत्मघातकी हल्ला घडवून आणला. आरडीएक्सने भरलेली एसयूव्ही कार मधून आलेल्या दहशतवादी आदिल अहमद दारने हा आत्मघातकी हल्ला केला. भारतीय लष्करी जवान प्रवास करत असलेल्या ठिकाणी कोणतीही नव्हती यामुळेच हा हल्ला झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सुरक्षा नसण्याला मुफ्ती मोहम्मद सईद यांचा एक निर्णय जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे.

2002 पर्यंत काश्मीरमधील भारतीय जवानांच्या ताफ्याला जम्मू काश्मीरमध्ये विशेष सुरक्षा दिली जात असले. याअंतर्गत भारतीय लष्कर कोणत्याही विभागातून जात असेल ते रस्ते रिकामी करण्यात येत होते. सुरक्षा रक्षकांचा ताफा जात असताना कोणते वाहन जात असेल तर ते थांबवण्यासाठी व्यवस्था तैनात असे. पण 2002-03 मध्ये तात्कालीन मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी हा नियम हटवला. सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो. सुरक्षा रक्षक देखील सर्वसामान्य नागरिक आहेत. त्यांच्या ताफ्याला वेगळी सुरक्षा देण्याची गरज नाही असे त्यांचे म्हणणे होते.

तात्कालीन मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर नियमात बदल झाला. विना सुरक्षा लष्करी जवान काश्मीरच्या रस्त्यांवरुन प्रवास करु लागले. पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये हीच त्रुटी दहशतवाद्यांनी ओळखली. 100 किलोग्रॅम स्फोटकांनी भरलेली कार लष्करी जवानांच्या बसवर आदळवली गेली. यामध्ये 40 जवान शहीद झाले. पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पाहणीसाठी गेलेल्या गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या समोर सीआरपीएफच्या एका जवानाने हा नियम पुन्हा लागू करण्याची मागणी केली आहे.

2014 मध्ये सरकारने बदललेला आणखी एक नियम लष्करासाठी घातक ठरल्याचे भाजपा खासदार सुब्रहण्यम स्वामी यांनी सांगितले. चेक पॉईंटवर कोणते वाहन रोखणे तसेच त्यावर बळ प्रयोग करण्याचा लष्कराचा अधिकार काढून घेण्यात आला होता. या कारणामुळे विस्फोटकांने भरलेली कार सीआरपीएफ जवानांच्या बसजवळ जाऊ शकली आणि देशाचे न भरून येणारे नुकसान झाले.
लष्कराने एका मारुती कारवर फायरिंग केली होती त्यानंतर त्यांच्याविरुद्ध केस सुरू झाली. आजही ते जवान तुरूंगात आहेत. यानंतर हा आदेश आणण्यात आला होता. 2 नोव्हेंबर 2014 ला बडगाममध्ये ही घटना घडली होती. दोन चेक पॉईंट्स तोडून ही कार पुढे जात होती. यामध्ये दहशतवादी असू शकतात अशी शंका जवानांना आली आणि कारवर फायरींग करण्यात आली. ज्यामध्ये दोन युवकांचा मृत्यू झाला. शोधानंतर असे कळाले की, मोहरमची यात्रा करुन हे दोन तरुण परतत होते. याप्रकरणी चार जवान दोषी आढळले आणि ते शिक्षा भोगत आहेत. या घटनेनंतर जम्मू काश्मीरमध्ये मोठा वादंग उफाळला. यानंतर सरकारने चेक पॉईंटवर बळाचा प्रयोग करण्याच्या नियमावर बंदी घातली होती.

Dailyhunt

https://m.dailyhunt.in/news/india/marathi/zee+news+marathi-epaper-zeemar/muphti+mohammad+said+yanchya+ya+nirnayamule+40+javan+shahid-newsid-108948395

हा नवा भारत! येथे ना बॉम्ब फेकणारा वाचेल, ना बॉम्ब पुरवणारा : मोदी


यवतमाळ : पुलवामा येथे गुरुवारी राखीव सुरक्षा दलावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये ४० जवानांना वीरगती प्राप्त झाली असून या दहशतवादी हल्ल्यास जशास तसे प्रतिउत्तर देण्यासाठी भारतीय सुरक्षा दलांना सर्वाधिकार प्राप्त करण्यात आले आहेत. या भ्याड दहशतवादी हल्ल्याबाबत समाजातील सर्वच स्तरांमधून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून या पाकिस्तान पुरस्कृत हल्ल्यास जशास तसे उत्तर देण्याची मागणी देशभरामधून जोर धरू लागली आहे.

दरम्यान, आज महाराष्ट्रातील यवतमाळ येथे विकासकामांच्या उदघाटनांसाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला. ते म्हणाले, 'हा नवा भारत आहे, या नव्या भारतामध्ये बंदूक चालवणारा असो की हाती बंदूक देणारा, बॉम्ब फेकणारा असो की बॉम्ब पुरवणारा, आमचे शूर सैनिक या सर्वांनाच पळता भुई थोडी करतील. या नव्या भारताची झलक संपूर्ण जगाला पाहायला मिळणार आहे.'

भारत नई नीति और नई रीति का देश है। ये अब दुनिया भी अनुभव करेगी।

बंदूक चलाने वाला हो या बंदूक पकड़ाने वाला, बम दागने वाला या बम देने वाला, हमारे बहादुर सुरक्षा बल किसी को चैन से सोने नहीं देंगे : पीएम श्री नरेन्द्र मोदी pic.twitter.com/b3lu8gkB3e

अतिरेक्यांची शिक्षा जवानच ठरवतील; मोदी यांचे स्पष्टीकरण; यवतमाळला विकासकामांचे भूमिपूजन


यवतमाळ / प्रतिनिधीः
पुलवामा दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना कोणती शिक्षा दिली जाईल, हे आमच्या देशाचे जवान ठरवतील, असे जाहीर करतानाच दहशतवाद्यांना शिक्षा कशी, कुठे, केव्हा दिली जाईल, तसेच ती कोण देईल हेदेखील आमचे जवानच ठरवतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र दौर्‍यावर असलेल्या मोदी यांनी यवतमाळ येथे आयोजित कार्यक्रमात अजनी-पुणे रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. त्या वेळी ते बोलत होते. पुलवामा हल्लयाचा बदला घेण्याचा पुनरुच्चार करीत पंतप्रधान मोदी यांनी भारतीय लष्करावर पूर्ण विश्‍वास असल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या पाठिशी संपूर्ण देश असून शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, दहशतवाद्यांना शिक्षा नक्कीच होईल, याचा पुनरुच्चार मोदी यांनी केला. माझा आपल्या देशाच्या सैनिकांबाबत फक्त अभिमानच नाही, तर विश्‍वासही आहे. दहशतवाद्यांना अद्दल घडवण्याची भारतीय सुरक्षा दलांना पूर्णपणे सूट देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांनीही देशाची सेवा करत असताना पुलवामा येथे आपल्या प्राणांची आहुती दिली, असे नमूद करून त्यांनी हुतात्म्यांना वंदन केले. ज्या कुटुंबांनी आपले पुत्र गमावले आहेत, त्यांचे दु:ख मी अनुभवत आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी पुलवामा हल्ल्यावरून पाकिस्तानला खडे बोलही सुनावले. पाकिस्तानात दहशतवादाला आश्रय दिला जातो. फाळणीनंतर अस्तित्त्वात आलेल्या या देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे, असे म्हणत पाकिस्तान हा दहशतवादाचे दुसरे नाव आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी पाकिस्तानला सुनावले. देशाने धैर्य बाळगावे, तसेच आपल्या जवानांवरही विश्‍वास ठेवावा असे आवाहन पंतप्रधानांनी या वेळी केले.
मोदी यांच्या विरोधात यवतमाळमध्ये बॅनर्स
यवतमाळमध्ये कार्यक्रम सुरू होण्याआधीच मोदी यांंच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली. मोदी सकाळी 10 वाजता नागपूरला पोहोचले होते. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे पोहोचले. याआधी पांढरकवडा येथे त्यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली. कोंगरा मार्गावर मोदी यांना विरोध दर्शवत 'मोदी गो बॅक'चे बॅनर्स लावण्यात आले होते. मोदी यांच्याविरोधात बॅनर लागले असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत ते हटवले. युवक काँग्रेसने हे पोस्टर लावले होते, अशी माहिती मिळते आहे.

वीर जवानांना देशभरातून श्रद्धांजली, शहीद जवानांवर अंत्यसंस्कार


नवी दिल्ली : काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी वेदनादायी ठरला. देशात ४० ठिकाणी ४० वीर जवानांच्या धगधगत्या चिता पाहण्याचा दुर्देवी प्रसंग भारतीयांवर ओढवला. देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांना साश्रू नयनांनी निरोप दिला. यात महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील नितीन राठोड आणि संजयसिंग राजपूत या दोन सुपुत्रांनाही वीरमरण आले. त्यांच्यावर आज संध्याकाळी मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

'नितीन राठोड, संजयसिंह राजपूत अमर रहे'च्या घोषणा आणि साश्रुनयनांनी या वीरपुत्रांना अखेरचा निरोप देण्यात आला.तसेच देशातही दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना शासकीय इतमामानात अंत्यसंस्कार कऱण्यात आले. पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, वाराणसी, कर्नाटक, राजस्थान, आसाम, हिमाचल प्रदेश, ओदिशा, बिहार, तामिळनाडू या ठिकाणी देशाच्या खऱ्या हिरोंना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सर्व शहीद जवानांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मध्य प्रदेश

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Madhya Pardesh CM Kamal Nath and former CM Shivraj Singh Chouhan paid their last respect to CRPF Constable Ashvni Kumar in Jabalpur, earlier today. #PulwamaAttack

441

8:54 PM - Feb 16, 2019

81 people are talking about this

Twitter Ads info and privacy

Embedded video

ANI

@ANI

Karnataka: Family members of CRPF Constable Guru H pay their tribute to him in Gudigere, Mandya. #PulwamaAttack

3,478

8:39 PM - Feb 16, 2019

1,472 people are talking about this

Twitter Ads info and privacy

महाराष्ट्र

ज्म्मू काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्राच्या दोन्ही सुपुत्रांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यातले मलकापूरचे संजय राजपूत आणि चोरपांगरा गावातले नितीन राठोड या दोघांना संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमाराला लाखोंच्या जनसमुदायानं साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. काश्मिरातल्या पुलवामात दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या महाराष्ट्रातल्या दोन जवानांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले... त्यांना अखेरचा निरोप देताना सगळ्यांनाच गहिवरून आलं.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Maharashtra: Visuals from Chorpangra, Baldana as mortal remains of CRPF Constable Nitin Shivaji Rathod are being brought for last rites. #PulwamaAttack

544

6:45 PM - Feb 16, 2019

161 people are talking about this

Twitter Ads info and privacy

कर्नाटक

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Karnataka: Visuals from Gudigere, Mandya as mortal remains of CRPF Constable Guru H are being brought for last rites. Family members pay their tribute to him. #PulwamaAttack

611

7:29 PM - Feb 16, 2019

209 people are talking about this

Twitter Ads info and privacy

मध्य प्रदेश

View image on TwitterView image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Madhya Pradesh: Security personnel and civilians hold a candle march in Bhopal to pay tribute to the soldiers who lost their lives in #PulwamaAttack

1,867

7:20 PM - Feb 16, 2019

632 people are talking about this

Twitter Ads info and privacy

हिमाचल प्रदेश

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Himachal Pradesh: Last rites ceremony of #CRPF Constable Tilak Raj at Dhewa in Kangra district. Union Minister JP Nadda and Chief Minister Jairam Thakur present. #PulwamaAttack

346

6:23 PM - Feb 16, 2019

91 people are talking about this

Twitter Ads info and privacy

पश्चिम बंगाल

पुलवामा हल्ल्याचा देशभरात निषेध व्यक्त करण्यात येतोय. पश्चिम बंगालमध्येही हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी काढण्यात आलेल्या मेणबत्ती मोर्चामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही सहभागी झाल्या होत्या. तसंच काळ्या फिती लावूनही हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

West Bengal: Mortal remains of CRPF Head Constable Bablu Santra and Constable Sudip Biswas brought to Kolkata airport

530

6:06 PM - Feb 16, 2019

141 people are talking about this

Twitter Ads info and privacy

जम्मू-काश्मीर

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Jammu & Kashmir: Tributes being paid to #CRPF's Naseer Ahmed at Rajouri; Union Minister Dr Jitendra Singh also present.

611

5:41 PM - Feb 16, 2019

194 people are talking about this

Twitter Ads info and privacy

ओदिशा

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Odisha: Wreath-laying ceremony of CRPF head constable PK Sahoo underway in Bhubaneswar. #PulwamaAttack

382

4:47 PM - Feb 16, 2019

114 people are talking about this

Twitter Ads info and privacy

प्रयागराज

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI UP

@ANINewsUP

Prayagraj: Last rites ceremony #CRPF Constable Mahesh Kumar who lost his life in #PulwamaAttack on 14th February

747

3:36 PM - Feb 16, 2019

156 people are talking about this

Twitter Ads info and privacy

बिहार

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI UP

@ANINewsUP

Wreath laying ceremony of #CRPF jawan Ramesh Yadav in Varanasi. #PulwamaAttack

541

3:23 PM - Feb 16, 2019

147 people are talking about this

Twitter Ads info and privacy

बिहार

View image on TwitterView image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Bihar: Visuals from Ratanpur, Bhagalpur as mortal remains of CRPF Constable Ratan Kumar Thakur are being brought to his home. His father (Pic 4) had said after the #PulwamaAttack, "I will send my other son as well to fight. But Pakistan must be given a befitting reply"

928

4:31 PM - Feb 16, 2019

313 people are talking about this

Twitter Ads info and privacy

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

#Bihar: Huge crowds gather to receive mortal remains of #CRPF Head Constable Sanjay Kumar Sinha in Masaurhi, in Patna district

1,446

2:44 PM - Feb 16, 2019

570 people are talking about this

Twitter Ads info and privacy

तामिळनाडू

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Tamil Nadu: Wreath-laying ceremony of CRPF constable Subramanian G. underway at Kovil Patti, Tuticorin. #PulwamaAttack

282

4:08 PM - Feb 16, 2019

117 people are talking about this

Twitter Ads info and privacy

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Tamil Nadu, Trichy: Defence Minister Nirmala Sitharaman lays a wreath on the mortal remains of CRPF Constable C. Sivachandran who lost his life in #PulwamaAttack

514

2:26 PM - Feb 16, 2019

155 people are talking about this

Twitter Ads info and privacy

Embedded video

ANI

@ANI

#WATCH Madhya Pradesh: Visuals from Jabalpur as the mortal remains of CRPF Constable Ashwani Kumar Kachhi are being brought to his home. #PulwamaAttack

2,937

2:14 PM - Feb 16, 2019

1,167 people are talking about this

Twitter Ads info and privacy

राजस्थान

View image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Rajasthan: Mortal remains of CRPF Constable Rohitash Lamba brought to his native place in Shahpura, Jaipur district, #PulwamaAttack

586

1:56 PM - Feb 16, 2019

204 people are talking about this

Twitter Ads info and privacy

Embedded video

ANI UP

@ANINewsUP

#WATCH: Visuals from the last rites ceremony of Constable Pankaj Kumar Tripathi of CRPF as his mortal remains are being brought to his home in Harpur Tola village of Maharajganj. #PulwamaAttack

1,446

1:47 PM - Feb 16, 2019

444 people are talking about this

Twitter Ads info and privacy

मध्य प्रदेश

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Madhya Pradesh: Mortal remains of #CRPF Constable Ashwani Kachhi brought to his native village in Jabalpur. #PulwamaAttack

860

1:36 PM - Feb 16, 2019

268 people are talking about this

Twitter Ads info and privacy