Sunday 17 February 2019

पुलवामा: अश्रूंच्या प्रत्येक थेंबाला न्याय देणार!


पुलवामा हल्ल्यानंतर आज अवघा देश शोकाकुल आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबतच प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू दाटले आहेत. या स्थितीत सरकार अत्यंत ठोस पावले टाकत असून तुमच्या डोळ्यातील प्रत्येक आसवाला न्याय दिला जाईल. ज्यांनी हे भ्याड कृत्य केले त्यांना अद्दल घडवली जाईल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated:Feb 16, 2019, 08:29PM IST

पुलवामा: अश्रूंच्या प्रत्येक थेंबाला न्याय देणार!

धुळे :

पुलवामा हल्ल्यानंतर आज अवघा देश शोकाकुल आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबतच प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू दाटले आहेत. या स्थितीत सरकार अत्यंत ठोस पावले टाकत असून तुमच्या डोळ्यातील प्रत्येक आसवाला न्याय दिला जाईल. ज्यांनी हे भ्याड कृत्य केले त्यांना अद्दल घडवली जाईल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला.
हा नवा भारत आहे. एकतर आम्ही कुणाची कुरापत काढत नाही आणि कुणी आमची कुरापत काढलीच तर त्याला सोडत नाही, हे आमचे स्पष्ट धोरण आहे. त्यामुळेच पुलवामा हल्ल्यानंतर भारताचा वेगळा चेहरा साऱ्या जगाला पाहायला मिळेल, असा सूचक इशाराच पंतप्रधानांनी दिला.
पुलवामातील शहिदांमध्ये महाराष्ट्राच्या मातीतील वीर जवानांचाही समावेश आहे, या वीरपुत्रांना जन्म देणाऱ्या मातांना मी वंदन करत आहे, असेही मोदी म्हणाले.

Embedded video

Narendra Modi

@narendramodi

The dastardly attack in Pulwama has anguished the nation.
Yes, this is a time of great sadness.
But, I assure every family that a befitting reply will be given!

33.2K

6:27 PM - Feb 16, 2019

11.4K people are talking about this

Twitter Ads info and privacy

No comments:

Post a Comment