Wednesday 21 September 2016

टपाल विभागाच्या टोल फ्री क्रमांकाची सुरुवात

नवी दिल्ली, टपाल विभागाने ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी 1924 या टोल फ्री क्रमांकाची सुरुवात केली आहे. या सेवेअंतर्गत ग्राहकांच्या टपालासंदर्भातील तक्रारींचे निवारण एका दिवसात करण्यात येणार आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री मनोज सिन्हा यांनी नुकतेच नवी दिल्लीत टपाल भवनात या सेवेचे उद्‌घाटन केले. ‘भारतीय टपाल सहायता केंद्र’ असे या केंद्राचे नाव आहे. या क्रमांकावर तक्रार केल्यानंतर तक्रारदाराला 11 अंकी तिकीट क्रमांक दिला जाणार आहे. त्यानंतर त्या क्रमांकाचा वापर करुन तक्रारदार आपल्या तक्रारीच्या निवारणाची स्थिती जाणून घेऊ शकणार आहे. रविवार आणि सुट्टींचे दिवस वगळून ही सेवा सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत सुरु राहणार आहे. ग्राहकांना कुठल्याही दूरध्वनी अथवा मोबाईल क्रमांकावरुन या हेल्पलाईनशी संपर्क साधता येईल.

No comments:

Post a Comment