Showing posts with label State - Jammu & Kashmir. Show all posts
Showing posts with label State - Jammu & Kashmir. Show all posts

Saturday, 18 March 2017

काश्‍मीरातील प्रकल्पांना गती; पाकिस्तान संतप्त

kashmir

या प्रकल्पांपैकी काही प्रकल्पांना पाकिस्तानने याआधीच विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पांमुळे जागतिक बॅंकेच्या मध्यस्थीने भारत व पाकिस्तानमध्ये झालेल्या पाणीवाटप कराराचा भंग होत असल्याचा कांगावाही पाककडून करण्यात आला आहे

नवी दिल्ली - जम्मु काश्‍मीर राज्यामधील एकूण 15 अब्ज डॉलर्स किंमतीच्या जलविद्युत प्रकल्पांच्या निर्मिती प्रक्रियेस केंद्र सरकारकडून वेग देण्यात आला आहे. या प्रकल्पांमुळे पाकिस्तानला काश्‍मीर खोऱ्यातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर नकारात्मक परिणाम होईल, अशी भीती पाकिस्तानकडून व्यक्त करण्यात आली होती. मात्र पाकच्या या "भीती'कडे भारताने दुर्लक्ष केले आहे.

भारतविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानने आश्रय न दिल्यास भारत-पाकमधील पाणीवाटप करारावर "परिणाम' होणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. या पार्श्‍वभूमीवर जम्मु काश्‍मीर राज्यामधील वर्षानुवर्षे रखडलेल्या प्रकल्पांच्या कामांना आता गती मिळाल्याचे वृत्त संवेदनशील मानले जात आहे.

या प्रकल्पांपैकी काही प्रकल्पांना पाकिस्तानने याआधीच विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पांमुळे जागतिक बॅंकेच्या मध्यस्थीने भारत व पाकिस्तानमध्ये झालेल्या पाणीवाटप कराराचा भंग होत असल्याचा कांगावाही पाककडून करण्यात आला आहे. या पाण्यावर पाकिस्तानमधील 80% शेती अवलंबून आहे.

जम्मु काश्‍मीर राज्यातील 1,856 मेगावॅट क्षमतेचा सावलकोट येथील प्रकल्प हा या प्रकल्पांमधील सर्वांत मोठा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्याआधी काही वर्षे लागणार आहेत. मात्र या प्रकल्पास मान्यता देण्यात आल्यामुळे दोन देशांमधील राजनैतिक तणाव आणखी वाढणार आहे. या प्रकल्पांमुळे जम्मु काश्‍मीरमधील जलविद्युतनिर्मिती तिपटीपेक्षाही जास्त प्रमाणात वाढणार आहे.

पाकिस्तानमधील पाणी पुरवठ्यावर "नियंत्रण' आणत भारत पाकवर राजनैतिक दबाव आणू शकेल, अशी शक्‍यता गेल्या काही वर्षांत परराष्ट्र संबंध तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर, या प्रकल्पांना गती देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणावर पाकिस्तानकडून संताप प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

वृत्तसंस्था

Tuesday, 27 September 2016

कश्‍मीर तो होगा, लेकिन...- श्रीमंत माने

 पाकिस्तानमधून आलेल्या अतिरेक्‍यांनी जम्मू-काश्‍मीरमधल्या उरीच्या लष्करी तळावर केलेला भ्याड हल्ला आणि त्यात धारातीर्थी पडलेल्या अठरा भारतीय जवानांच्या हौतात्म्यामुळे प्रत्येक भारतीयाला प्रचंड वेदना झाल्या आहेत. गेल्या रविवारच्या या घटनेनंतर देशाच्या कानाकोपऱ्यात पाकिस्तानविरुद्ध मोठा क्षोभ आहे. भारतीय मने व्याकूळली आहेत. "दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांनी हल्ल्याचा बदला घ्यावा‘, ही देशवासीयांची भावना आहे. बदलादेखील कसा तर जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचे नामोनिशाण मिटेल असा. ही भावना नेमकेपणाने व्यक्‍त करणारी एका अनामिकाची हिंदी कविता "सोशल मीडिया‘वर "व्हायरल‘ आहे. त्या कवितेचा "व्हिडिओ‘ उरीतल्या हल्ल्यानंतर प्रथम "यूट्यूब‘वर आला. "कश्‍मीर तो होगा, लेकिन पाकिस्तान नही होगा‘, या मथळ्याची ही वीररसातील कविता हिमाचल प्रदेश पोलिसांचा एक जोशिला हेड कॉन्स्टेबल पोलिस जवानांनी भरलेल्या एका बसमध्ये मोठ्या आवाजात म्हणतोय आणि बसमधले त्याचे सहकारी समूहस्वरात "पाकिस्तान नही होगा‘, अशी त्याला साथ देताहेत, असा तो "व्हिडिओ‘ आहे. त्या हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे मनोज ठाकूर. आठवडाभरात लाखो भारतीयांनी तो पाहिलाय. "फेसबुक‘, "व्हॉट्‌सऍप‘वर तो वेगाने पुढे पाठवला जातोय.
पाकिस्तान ये कान खोलकर सुन ले,
अबकी अगर जंग छिडी तो नामोनिशान नहीं होगा
कश्‍मीर तो होगा, लेकिन पाकिस्तान नहीं होगा

असा इशारा नाठाळ शेजारी देशाला या कवितेतून देण्यात आला आहे. भारताचे स्वातंत्र्य, त्या वेळी झालेली फाळणी, पाकिस्तानचा जन्म आणि टोळीवाल्यांचा हल्ला ते 1965, 1971चे युद्ध, कारगिलमधील घुसखोरी अशा आतापर्यंतच्या पाकविरुद्धच्या लढाया, वेळोवेळी झालेले शांतता करार आदींचे संदर्भ देत ही कविता पुढे सरकते.

हम डरते नहीं अणुबम्बो और विस्फोटक जलपोतों से
हम डरते है शिमला और ताश्‍कंद जैसे समझोतों से

असं परखड मत मांडतानाच या कवितेत दुश्‍मनांना समज देण्यात आलीय, की

सियार भेडियों से डर सकती, सिंहों की औलाद नहीं
भारत वंश के इस पानी की है तुमको पहचान नहीं

या कडव्याने भारतवासीयांच्या शौर्याची आठवण करून देण्यात आलीय आणि "विश्‍व के मानचित्र पर पाकिस्तान नहीं होगा‘, असा इशारा दिला गेलाय.
"सोशल मीडिया‘ व अन्य माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, हा "व्हिडिओ‘ उरी हल्ल्यापूर्वीच, गेल्या कारगिल विजय दिनाला, 26 जुलैला तयार केला होता. महत्त्वाचे म्हणजे ही कविता कुणाची आहे, याचा शोध गेली अनेक वर्षे संमेलने व कथांमध्ये ही कविता ऐकविणाऱ्या साध्वी बालिका सरस्वती किंवा बालिका साध्वी ठाकूर यांनाही माहिती नाही. साध्वी बालिका सात वर्षांच्या असल्यापासून कथा करतात व तेराव्या वर्षी त्यांनी ही कविता पहिल्यांदा गायली. केवळ भारतातच नव्हे; तर देशाबाहेरच्या अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्येही तिचा उच्चार झाला. इंग्लंडमध्ये वगैरे दहशतवादाविरोधातला भारतीय आवाज असे तिचे वर्णन केले गेले. "आयएसआय‘ व अन्य काही संघटनांकडून त्यासाठी साध्वी बालिका सरस्वती यांना धमक्‍याही मिळाल्या. असे मानले जाते, की साध्वी बालिकाने गायलेली ही कविता मनोज ठाकूर यांनी ऐकली असावी. ओतप्रोत देशप्रेम आणि भारतीयांच्या मनातला पाकविरोधी संताप नेमकेपणाने व्यक्‍त करणारी ती असल्याने त्यांनी सहकारी जवानांच्या साक्षीने गाऊन तिचा "व्हिडिओ‘ तयार केला असावा. उरी हल्ल्यानंतर ती अशी "व्हायरल‘ झाली, तेव्हा मनोज ठाकूर यांनी देशवासीयांना उद्देशून एक संदेशही "सोशल मीडिया‘वर टाकला. तमाम भारतीयांच्या प्रखर देशभक्‍तीला त्या संदेशात त्यांनी सलाम केलाय.

Saturday, 24 September 2016

PM Modi hits out at Pakistan after attack in Kashmir

Kozhikode: Prime Minister Narendra Modi criticised Pakistan on Saturday, accusing it of being an exporter of terrorism, and vowing to mount a global campaign to isolate it.

"People of Pakistan should question their leadership on why, when both countries gained freedom together, while India exports software, Pakistan exports terrorists," PM Modi said.

"People of Pakistan should question their leadership on why, when both countries gained freedom together, while India exports software, Pakistan exports terrorists," PM Modi said.

The comments follow the September 18 attack on an Indian army camp in Kashmir, which New Delhi blamed on Pakistan. The attack claimed the lives of 18 Indian soldiers, in the biggest blow to security forces in the disputed Himalayan region for 14 years.

"People of Pakistan should question their leadership on why, when both countries gained freedom together, while India exports software, Pakistan exports terrorists," Modi said.

India has long accused Pakistan of backing militant groups operating in disputed Kashmir as well as of sending fighters to other parts of the country to carry out acts of violence.

Pakistan denies the allegations and says India has not provided adequate proof to support its claims.

Modi was giving a speech at a meeting of his Bharatiya Janata Party, whose leaders have said there should be a strong response to the attack, which took place in Uri.

"India has and never will bow down in the face of terrorism," Modi said.

Some military experts have called for cross border strikes against militant camps in Pakistan-administered Kashmir in the wake of the latest attack.

But Pakistan has warned it will hit back against any Indian attack and the latest tensions between the nuclear-armed neighbours are drawing concern.

India is likely holding back from major military action for fear of igniting a broader escalation, and may instead mount a diplomatic campaign against Pakistan, experts say.

Reuters

काश्‍मिरातील स्थितीबाबत राजनाथ-पर्रीकर यांची चर्चा

नवी दिल्ली - उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्री राजनाथसिंह आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज काश्‍मीरमधील परिस्थितीबाबत चर्चा केली. तसेच अंतर्गत सुरक्षेचा आणि पुढील महिन्यात गोव्यामध्ये होणाऱ्या "सार्क‘ परिषदेच्या सुरक्षेचाही या दोघांनी आढावा घेतल्याचे सांगण्यात आले.

गृहमंत्रालयात दुपारी बाराच्या सुमारास दोन्ही मंत्र्यांची बैठक झाली. उरीमधील दहशतवादी हल्ल्यात 18 जवानांना हौतात्म्य पत्करावे लागल्याने देशभरात संतापाची लाट उसळली असून, पाकिस्तानविरुद्ध ठोस कारवाईसाठी सरकारवर दबावही येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राजनाथसिंह आणि पर्रीकर यांनी अर्धा तास चाललेल्या या बैठकीदरम्यान काश्‍मीरमधील परिस्थिती, तसेच नियंत्रण रेषेवरील स्थितीचा आढावा घेतला आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा केली. पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर डोळ्यांत तेल घालून लक्ष देण्याचे आदेश सुरक्षा दलांना देण्यात आले आहेत. सीमेवर होणारी घुसखोरी रोखण्यासाठीच्या उपाययोजना, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात नौदल तळाच्या परिसरात संशयितांचा वावर असल्याची माहिती याबाबतही दोन्ही मंत्र्यांनी चर्चा केली. "ब्रिक्‍स‘ परिषदेच्या सुरक्षेचाही मुद्दा या चर्चेत होता असे सांगण्यात आले. गोव्यात (पणजी) 15 व 16 ऑक्‍टोबरला ही परिषद होणार आहे. यात भारताव्यतिरिक्त ब्राझील, चीन, रशिया आणि दक्षिण आफ्रिकेचे उच्चस्तरीय प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सध्याच्या तणावग्रस्त वातावरणात या परिषदेची सुरक्षा महत्त्वाची असल्याने त्याबाबतही गृहमंत्री व संरक्षण मंत्र्यांनी आढावा घेतल्याचे सांगण्यात आले.

- - सकाळ न्यूज नेटवर्क

Sunday, 18 September 2016

उरीतील हल्ला पाकिस्तान पुरस्कृतच- सुभाष भामरे

नाशिक - जम्मू काश्मीरमधील उरी येथील लष्करी मुख्यालयावर करण्यात आलेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तान पुरस्कृतच आहे. आता प्रतिउत्तर देण्याची वेळ आली आहे, असे मत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी व्यक्त केले.
जम्मू काश्मीरमधील उरी येथे असलेल्या लष्कराच्या मुख्यालयावर आज (रविवार) सकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्लात 17 जवान हुतात्मा झाले असून, 8 जवान जखमी झाले आहेत. सुरक्षा रक्षकांनी चार दहशतवाद्यांना ठार मारले आहे. या हल्ल्यानंतर भामरे नाशिक दौरा रद्द करून दिल्लीला रवाना झाले आहेत.
भामरे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला घेरण्याची वेळ आली आहे. आता खूप झाले, प्रतिउत्तर देण्याची वेळ आली आहे. उच्चस्तरीय समितीची बैठक होत असून, या बैठकीत माझी भूमिका हीच असेल. लंडनमध्ये गेल्यानंतर सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादासंदर्भात मी जगातील संरक्षणमंत्र्यांपुढे भूमिका मांडलेली आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे अमेरिका फ्रान्ससह इतर देशांसोबत झालेल्या बैठकीत भूमिका मांडली होती. पाकिस्तानसोबत असलेल्या देशांनी दहशतावादासंदर्भात गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
- महेंद्र महाजन - सकाळ वृत्तसेवा

रविवार, 18 सप्टेंबर 2016 - 12:27 PM IST

Saturday, 13 August 2016

काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य घटक

नवी दिल्ली - काश्‍मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर यावी, यासाठी आवाहन करणारा आणि काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे, या वज्रनिर्धाराचा पुनरुच्चार करणारा ठराव एकमुखाने मंजूर करून लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. काश्‍मीरच्या मुद्द्यावर भारत कोणताही तडजोड करणार नाही, असेही संसदेने पुन्हा एकदा स्पष्टपणे बजावले. 

राज्यसभेमध्ये दोन दिवसांपूर्वी काश्‍मीरप्रश्‍नी प्रदीर्घ चर्चा होऊन एकसुरात काश्‍मीरच्या अविभाज्यतेचा ठराव मंजूर करण्यात आला होता. आज लोकसभेमध्ये कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी असा ठराव मांडण्याची सूचना केली. संपूर्ण सभागृहाने पाठोपाठ गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही या सूचनेला संमती दर्शविली. लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी या प्रस्तावाचे वाचन केल्यानंतर एक आवाजात ठराव मंजूर करण्यात आला.

लोकसभेने या प्रस्तावाद्वारे काश्‍मीरमध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेली संचारबंदी आणि हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच तेथील परिस्थिती सुरळीत होण्यासाठी त्वरित पावले उचलण्यासाठी सरकारला आवाहनही केले. देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रीय सुरक्षा सर्वोच्च आहे. त्यावर कोणत्याही प्रकारची तडजोड मान्य केली जाणार नाही; परंतु काश्‍मीरमधील तणाव निवळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, जेणेकरून तेथे शांतता प्रस्थापित होईल आणि सामान्य जनतेला सोसाव्या लागणाऱ्या अडचणी दूर होतील. जम्मू-काश्‍मीरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे यावे. तसेच तेथील तरुणाईमध्ये विश्‍वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्पही लोकसभेने सोडला.

सलग दुसऱ्यांदा सहमती
जम्मू-काश्‍मीरवरील ठराव एकमुखाने मंजूर झाल्यामुळे संपूर्ण सभागृहाचे एकाच मुद्द्यावर एकमत होण्याचा एका आठवड्यात हा दुसरा प्रसंग असल्याची टिप्पणी तृणमूल कॉंग्रेसचे नेते सुदीप बंदोपाध्याय यांनी केली. या ठरावाआधी मालमत्ता आणि सेवाकराबाबतचे (जीएसटी) घटना दुरुस्ती विधेयक दोन्ही सभागृहांनी सर्वसंमतीने मंजूर केले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

-- सकाळ न्यूज नेटवर्क

पाकिस्तानबाबत आता 'धटासी धट...'

नवी दिल्ली - काश्‍मीरमधील ताज्या संघर्षाला चिथावणी देणाऱ्या पाकिस्तानातील बलुचिस्तान आणि व्याप्त काश्‍मीरमधील नागरिकांची दैन्यावस्था, त्यांच्यावरील पाकिस्तानचे अत्याचार व तेथील हिंसाचार आंतरराष्ट्रीय व्यासपीठाच्या चव्हाट्यावर मांडण्याचे "धटासी असावे धट...‘ असे आक्रमक धोरण आखण्याचे भारताने ठरविले आहे. संसदेत काश्‍मीर मुद्द्यावर आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "काश्‍मीरचा तर सवालच नाही; पण पाकिस्तानने बळकावलेले काश्‍मीर (पीओके) हाही भारताचाच अविभाज्य भाग आहे,‘ असे ठणकावून हा विषय प्रथमच ऐरणीवर आणला.

काश्‍मीरमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठविण्याची विरोधकांची मागणी सरकारने तातडीने मान्य केली नाही. मात्र, "काश्‍मीरमधील सर्व संबंधित गटांशी केंद्र चर्चा करेल,‘ असा दिलासाही दिला. खोऱ्यातील परिस्थिती निवळल्यानंतर मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी बोलून सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या दौऱ्याचा कार्यक्रम ठरवता येईल, असे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले. काश्‍मिरातील सामान्य जनजीवन पूर्वपदावर येत असून, शिक्षणसंस्था, बाजारपेठा, पर्यटनादी उद्योग हळूहळू सुरू होत आहेत, असे अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले. देशाच्या अखंडतेबाबत सर्वच पक्षनेत्यांनी "वयं पंचाधिकं शतम्‌,‘ अशा एका सुरात भावना मांडल्याचे राजनाथसिंह यांनी सांगितले.

काश्‍मीरमध्ये गेले 34 दिवस जारी असलेली संचारबंदी, 60 हून जास्त जणांचे मृत्यू व किमान पाच हजार सुरक्षारक्षक व नागरिक जखमी झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर संसदेत झालेल्या सर्वपक्षीय चर्चेत विरोधी पक्षांनी केलेली सर्वपक्षीय बैठकीची मागणी सरकारने मान्य केली होती. त्यानुसार संसदीय ग्रंथालय भवनात पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी साडेबारा ते साडेतीन अशी तब्बल तीन तास बैठक झाली. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, तसेच राजनाथसिंह, जेटली, सुषमा स्वराज, जितेंद्रसिंह, हंसराज अहिर हे मंत्री उपस्थित होते. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, मुलायमसिंह यादव, "पीडीपी‘चे नेते मुझफ्फर बेग व रसूल मीर, सीताराम येचुरी, भर्तुहरी महाताब, नवनीत कृष्णन, शरद यादव, रामदास आठवले, संजय राऊत व चंद्रकांत खैरे आदी नेतेही उपस्थित होते. नॅशनल कॉन्फरन्स पक्ष बैठकीला गैरहजर होता. त्याबद्दल सरकारी गोटातून, डॉ. फारुख अब्दुल्ला प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकले नाहीत, असे सांगण्यात आले.

या बैठकीत काश्‍मिरी नागरिकांना आश्‍वस्त करणे व भारत त्यांच्या भल्याची काळजी करतो, याची खात्री त्यांच्या मनात निर्माण करणे आवश्‍यक असल्याचा सल्ला डॉ. मनमोहनसिंग यांनी दिला. काश्‍मीरमधील सर्व राजकीय प्रवाहांशी चर्चा करण्याचा आग्रह आपण धरल्याचे बेग यांनी नमूद केले. काश्‍मिरी निदर्शकांवर पॅलेट गनचा मारा त्वरित थांबवावा, अनावश्‍यक तेथून लष्कराला माघारी बोलवावे, सर्व पक्षांशी चर्चा करताना फुटीरतावाद्यांना वगळू नये, अशा सूचना डाव्या पक्षांनी केल्या. काश्‍मीरमधील हिंसाचाराला व चिथावणीला पाकिस्तानच जबाबदार असल्याचे सिद्ध झाल्याने भारतानेही व्याप्त काश्‍मीरमध्ये तसेच धोरण आखावे, असे आठवले यांनी सांगितले.

राजनाथसिंह व जेटली यांनी अधिकृत निवेदन करताना सांगितले, की काश्‍मीरमध्ये शांततेची पुनर्स्थापना करण्यासाठी सर्व पक्षांनी केलेल्या विधायक सूचनांची अंमलबजावणी सरकार करेल या वचनबद्धतेचा पुनरुच्चार बैठकीत करण्यात आला. काश्‍मीर मुद्द्याचे समाधान घटनात्मक चौकटीत करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला. प्रत्येक काश्‍मिरी नागरिक भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत व शांततामय जीवन जगू इच्छितो, असे सांगताना मोदींनी शेजारी देशाच्या चिथावणीचा उल्लेख केला. सामान्य काश्‍मिरी नागरिकांचे संचारबंदीमुळे होणारे हाल व त्यांच्या वेदनांकडे केंद्र सहानुभूतीने पाहते व त्यासाठी जीवनावश्‍यक वस्तू, भाजीपाला, स्वयंपाकाचा गॅस आदींचा वेळोवेळी पुरवठा केला जात आहे. पॅलेट गनचा कमीतकमी मारा करण्याच्या सूचना लष्कराला दिल्या आहेत. मात्र याबाबत तज्ज्ञांची समिती चौकशी करत आहे व तिचा अहवाल आल्यावरच त्यांच्या वापराबद्दल निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. काश्‍मीरमध्ये 2010 पासूनच पॅलेट गनचा वापर सुरू आहे, याकडे जेटली यांनी सूचकपणे लक्ष वेधले. मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यातील हॉटलाइन संवादावर जेटलींनी, पाकिस्तानच्या कागाळ्यांबद्दल याआधीचे सारेच पंतप्रधान त्या देशाला वेळोवेळी जाहीर समज देत आले आहेत. त्यासाठी हॉटलाइनच हवी असे नाही, अशी कोपरखळी मारली.

पंतप्रधान बैठकीत म्हणाले...

- काश्‍मीरमध्ये अलीकडे घडलेल्या घटना व हिंसाचारामुळे अन्य देशवासीयांप्रमाणेच मीदेखील दुःखी आहे.

- राजकीय मतभेद असले, तरी देशाची एकता व अखंडतेसाठी आम्ही सारे एकजूट दाखवतो, हे या बैठकीत पुन्हा दिसले.

- जम्मू-काश्‍मीर, लडाख याबरोबरच व्याप्त काश्‍मीर हाही भारताचाच अविभाज्य भाग.

- पाकिस्तानमधील सर्व संबंधित गटांशी चर्चा करणार; पण देशाच्या सुरक्षेशी व अखंडतेशी तडजोड नाही.

- काश्‍मिरातील अशांततेची पाळेमुळे सीमेपलीकडील दहशतवादात आहेत. शेजारी देशाकडून काश्‍मिरातील दहशतवादी गटांना बळ व रसद मिळते.

- पाकिस्तान हे विसरतो, की तो स्वतःच्याच देशवासीयांवर लढाऊ विमानांद्वारे बॉंबचा वर्षाव करतो. पाकिस्तानला आता बलुचिस्तान व व्याप्त काश्‍मिरातील लोकांवर होणाऱ्या अत्याचाराचे उत्तर साऱ्या जगाला द्यावे लागेल, ती वेळ आता आली आहे.

- जम्मू-काश्‍मीरच्या मुद्द्यावर कायमस्वरूपी व शांततामय तोडगा काढण्यासाठी भारत वचनबद्ध आहे. त्यासाठी केंद्र सरकार अटलबिहारी वाजपेयी यांनी दाखविलेल्या मार्गावरून जात आहे.

-- सकाळ न्यूज नेटवर्क

पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग- पंतप्रधान

नवी दिल्ली- काश्मीरमध्ये अशांतता ही पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामुळे आहे. दहशतवादाशी कठोरपणे सामना करू, तसेच पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितले. मोदी म्हणाले, "कायद्याच्या राज्याशी भारताची असलेली निष्ठा ही कमजोरी आहे असे विरोधी शक्तींनी समजू नये. पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना सहभागी केल्याशिवाय काश्मीरचा मुद्दा सोडविला जाऊ शकत नाही. पाकव्याप्त काश्मीरचे जे लोक दुसरीकडे राहत आहेत त्यांनाही चर्चेत सहभागी करणे आवश्यक आहे." काश्मीरच्या सद्यस्थितीवर विचार करण्यासाठी येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीच्या समारोपावेळी मोदी यांनी भाषण केले. त्यावेळी ते म्हणाले की, संविधानाच्या मूलभूत सिद्धांतांनुसार काश्मीर प्रश्नावर शांततापूर्वक आणि स्थायी स्वरुपाचा तोडगा काढण्यासाठी सरकार प्रतिबद्ध आहे. त्यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दाखविलेल्या मार्गावरून आम्ही जात आहोत.

Wednesday, 27 July 2016

काश्‍मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान - - पीटीआय

श्रीनगर - काश्‍मीरमधील नियंत्रण रेषेवरील (जि. कुपवाडा) नोगाम भागात मंगळवारी चकमकीत जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तसेच एकाला जिवंत पकडण्यात यश आल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.

सर्व दहशतवादी परदेशी नागरिक आहे. चकमक अजूनही सुरू आहे. त्यामुळे हा घुसखोरीचा प्रयत्न होता का, याविषयी लगेचच निष्कर्ष काढता येणार नाही, असे सांगून अधिकारी म्हणाला, अटक केलेल्या दहशतवाद्याकडून महत्त्वाची माहिती समजण्याची शक्‍यता आहे.
लष्कराचे यश
दरम्यान, कुपवाडातील चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले, हे लष्कराचे मोठे यश आहे. या कारवाईमुळे पाकिस्तानचा कट उधळून लावला आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृह खात्याचे राज्यमंत्री किरण रिज्जू यांनी नवी दिल्ली येथे दिली.

Wednesday, 15 June 2016

Mobile internet services suspended in Jammu

Jammu: The mobile internet services in Jammu were suspended on Wednesday after violence erupted in the region following the alleged desecration of Aap Shambu temple in Janipura area.

"The protesters intended to attack the police station, so we resorted to mild lathicharge and tear gas to disperse them," DM Jammu, Simrandeep Singh told the media.

"The protesters intended to attack the police station, so we resorted to mild lathicharge and tear gas to disperse them," DM Jammu, Simrandeep Singh told the media.

Meanwhile, the Jammu and Kashmir Police have arrested a youth for alleged desecration of Aap Shambu temple in Janipura area.

As per reports, a youth entered Aap Shambu temple in Janipura area and broke the protective glass in front of the idols.

He also allegedly misbehaved with women performing aarti.

"Although we have arrested him, we are unable to carry out a probe into the matter as we are busy managing aggressive crowd. Many of them (protestors) were under influence of alcohol and even tried to gherao the police station," District Magistrate, Jammu, Simrandeep Singh told the media here.

"They intended to attack the police station, so we resorted to mild lathicharge and tear gas to disperse them," he added.

He further said Section 144 is not needed in the area, as the situation is under control.

The protesters were demanding immediate arrest of the accused and suspension of two police officers who allegedly backed the accused and abused the complainants.

Reinforcements were rushed to Janipura to prevent protesters from heading towards the old city. Senior civil and police officers were camping at the police control room to monitor the situation.

ANI