Showing posts with label शहिद. Show all posts
Showing posts with label शहिद. Show all posts

Wednesday, 27 July 2016

कारगिल युद्धातील हुतात्म्यांना 'सॅल्यूट' - नरेंद्र मोदी - - पीटीआय

नवी दिल्ली - तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने 1999 मधील कारगिल युद्धात खंबीरपणा दाखविल्यानेच भारताला नेत्रदीपक विजय मिळाला. या युद्धात देशासाठी ज्या जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना माझा "सॅल्यूट‘, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

कारगिल विजय दिनानिमित्त मोदी यांनी आज "ट्विट‘ केले. मोदी म्हणाले, ‘1999 मध्ये त्यावेळच्या सरकारने खंबीरपणे घेतलेल्या निर्णयाचा मला आजही अभिमान वाटतो. कारगिलमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शत्रूंना भारतीय जवानांनी जशास तसे दिलेले उत्तर अविस्मरणीय आहे. भारतीय लष्कराच्या धैर्याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि भारत या धैर्याला कदापी विसरणार नाही. शेवटच्या श्‍वासापर्यंत जे जवान लढले, ज्यांनी देशासाठी त्याग केला, त्यांची प्रेरणा आम्ही घेत राहू.‘‘
द्रास येथे श्रद्धांजली
लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्ट. जनरल डी. एस. हुडा यांनी आज जम्मू आणि काश्‍मिराच्या द्रास भागात कारगिल युद्धातील हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. द्रास येथील ऐतिहासिक स्मृतीस्थळाला हुडा यांनी भेट दिली. कारगिल युद्धात भारतीय लष्कराने केलेल्या नेत्रदीपक कामगिरीचा त्यांनी या वेळी गौरव केला. या वेळी लष्करातील अधिकारी आणि जवान उपस्थित होते.

कारगिल युद्धातील हुतात्म्यांना 'सॅल्यूट' - नरेंद्र मोदी - - पीटीआय

नवी दिल्ली - तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने 1999 मधील कारगिल युद्धात खंबीरपणा दाखविल्यानेच भारताला नेत्रदीपक विजय मिळाला. या युद्धात देशासाठी ज्या जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना माझा "सॅल्यूट‘, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

कारगिल विजय दिनानिमित्त मोदी यांनी आज "ट्विट‘ केले. मोदी म्हणाले, ‘1999 मध्ये त्यावेळच्या सरकारने खंबीरपणे घेतलेल्या निर्णयाचा मला आजही अभिमान वाटतो. कारगिलमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शत्रूंना भारतीय जवानांनी जशास तसे दिलेले उत्तर अविस्मरणीय आहे. भारतीय लष्कराच्या धैर्याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि भारत या धैर्याला कदापी विसरणार नाही. शेवटच्या श्‍वासापर्यंत जे जवान लढले, ज्यांनी देशासाठी त्याग केला, त्यांची प्रेरणा आम्ही घेत राहू.‘‘
द्रास येथे श्रद्धांजली
लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्ट. जनरल डी. एस. हुडा यांनी आज जम्मू आणि काश्‍मिराच्या द्रास भागात कारगिल युद्धातील हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. द्रास येथील ऐतिहासिक स्मृतीस्थळाला हुडा यांनी भेट दिली. कारगिल युद्धात भारतीय लष्कराने केलेल्या नेत्रदीपक कामगिरीचा त्यांनी या वेळी गौरव केला. या वेळी लष्करातील अधिकारी आणि जवान उपस्थित होते.

Monday, 23 May 2016

महाराष्ट्रमुंबई महाराष्ट्राच्या सुपुत्राला काश्मिरात वीरमरण

श्रीनगर कुपवाडा जिल्ह्यातील ड्रगमुला भागात जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत जखमी झालेले नायक पांडुरंग महादेव गावडे यांना वीरमरण आलं आहे. गावडे यांचं रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाल्याची माहिती आज संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. 

पांडुरंग गावडे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथील सुपुत्र होते. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचं पार्थिव सिंधुदुर्गातील त्यांच्या मूळगावी पाठवण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीरच्या सीमाभागात असलेल्या कुपवाडा जिल्ह्यात शनिवारी तब्बल नऊ तास चाललेल्या चकमकीत भारतीय जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर देत पाच दहशतवाद्यांना यमसदनी धाडले होते. ४७ राष्ट्रीय रायफल्स, ४१ राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली होती. या चकमकीत दहशतवाद्यांशी लढताना ४१ राष्ट्रीय रायफल्सचे पांडुरंग महादेव गावडे, ४७ राष्ट्रीय रायफल्सचे अतुल कुमार व अन्य एक जवान गंभीररीत्या जखमी झाले होते. पांडुरंग यांच्या चेहऱ्यावर गोळी लागली होती तर अतुल यांच्या उजव्या खांद्याला गोळी लागली होती. या दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत प्रथम ड्रगमुला येथील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर श्रीनगर येथील रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले होते. तिथे उपचार घेत असतानाच आज पांडुरंग गावडे यांची प्राणज्योत मालवली. 


पाच वर्षापूर्वी झाले होते भरती :

 पांडुरंग हे सावंतवाडी तालुक्यातील आंबोली-मुळवंदवाडीतील होते. पाच वर्षांपूर्वीच ते लष्करात भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा अवघा दोन ते तीन महिन्यांचा आहे. पांडुरंग यांच्या निधनाने गावडे कुटुंब तसेच संपूर्ण आंबोलीवरच शोककळा पसरली आहे. 

मटा ऑनलाइन वृत्त 

Sunday, 6 December 2015

Our Real Heroes : Indian Army Soldiers

Respect & Big Salute...
Our Real Heroes : Indian Army Soldiers
3 Atankwadi ko marne ke baad Shahid hua, Bharat mata ke Veer Sapoot :
Shahid Bharat mata ke Laal ko Shat Shat Naman :
Shahidon ki chintao par lagenge har baras melee ...
Watan par mitne walo ka baki yahi nishan hoga
Jai hind. Jai jawan. Vande mataram. Bharat mata ki jai.

 

Saturday, 21 November 2015

शहीद संदीप संतोष ह्याळीज

भावपूर्ण श्रध्दांजली

 

बागलान तालुकयातील आखातवाडे गावातील भूमीपूत्र श्री संदीप संतोष ह्याळीज सीमेवर लढाईत वीरमरण आले. पार्थिव आज संध्याकाळपर्यंत आखातवाडे येथे आणण्यात येणार आहे.



 

Thursday, 19 November 2015

शहिद संतोष मधुकर घोरपडे - वेटेरन दिलीप हिरे


मुळ नाव संतोष मधुकर घोरपडे
जन्म पोगरवाडी ता सातारा
शेजारील आरेदरे गावात माऊशी रहाते
माऊशीने दत्तक घेतले तेव्हा पासुन त्याचे नाव
संतोष महाडिक
संतोषचे वडीलांचे दुकान पोवई नाका येथील विजय टेलर
त्यांच्या वडीलांचे गेल्या वर्षी निधन झाले
त्याचा भाऊ दुध व्यवसाय करतो
साताऱ्यातल्या पोगरवाडीत आज कमालीची शांतता आणि शोककळा आहे. पोगरवाडीनं आणखी एक सुपुत्र गमावलाय. कर्नल संतोष महाडिक दहशतवाद्यांविरोधात लढताना धारातीर्थी पडलेत. कर्नल संतोष महाडिक यांना श्रीनगर इथं लष्कराच्या जवानांची मानवंदना दिली. त्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळगावी नेण्यात आलंय.
साताऱ्यातलं पोगरवाडी हे त्यांचं मूळ गाव आहे. काल दुपारपासूनचं गावात अनामिक शांतता  पसरलीय. कर्नल महाडिकांचे मित्र, आप्तेष्टांचं ऊर त्यांच्या आठवणी सांगताना भरून येतोय. संध्याकाळी याच गावात कर्नल महाडिकांवर संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंत्कार होणार आहेत. 
संपुर्ण जगाच्या नजरा या सीरियावर आहेत. याच दरम्यान काश्मीरमध्ये देशाचा एक जवान दहशतवाद्यांच्या गोळ्यांचा शिकार बनला. लष्कर-ए-तोयबाच्या चार ते पाच अतिरेक्यांनी १२ दिवसांपूर्वी घुसखोरी केल्याची पक्की खबर लष्कराला मिळाली होती.
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ मनीगाहमध्ये हे अतिरेकी दडून बसले होते. त्यांना कंठस्नान घालण्यासाठी कर्नल संतोष महाडिक निघाले होते. 
तब्बल १२ दिवस चाललेल्या या ऑपरेशनमध्ये जाँबाज सैनिकांनी दहशतवाद्यांना तीन वेळा कोंडित पकडलं. मात्र, तिन्ही वेळा ते पळून गेले. अखेर लष्करानं कर्नल संतोष महाडिक यांच्याकडे या ऑपरेशनचं नेतृत्व दिलं. यानंतर सुरु झाली अतिरेकी आणि जवानांमधली चकमक. १६०-टीए बटालियनचे जवान मजलूम अहमद यांच्यासह तीन जवान जखमी झाले. 
एकीकडे जवान जखमी होत असताना कर्नल महाडिकांनी झुंज सुरूच ठेवली. दुपारी अडीचच्या सुमारास त्यांनी आपल्या जवानांसह अतिरेक्यांच्या दिशेनं कूच करायला सुरूवात केली... पण... मात्र एका बेसावध क्षणी अतिरेक्यांच्या गोळीनं हा जाँबाज लढवय्या टिपला. त्यांच्या डोक्यात आणि पोटाला गोळ्या लागल्या. त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेचच त्यांना रुग्णालयात हलवलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता.
 
वेटेरन दिलीप हीरे
मालेगाव् तालुका जय जवान संघ