Showing posts with label Chinna. Show all posts
Showing posts with label Chinna. Show all posts

Friday, 10 March 2017

अमेरिकेची दादागिरी रोखण्यासाठी चीनने उतरवले शक्तीशाली J-20

बिजींग, दि. 10 - अमेरिकेच्या तुल्यबळ लष्करी सामर्थ्य उभे करण्याचा प्रयत्न करणा-या चीनने पाचव्या पिढीचे J-20 लढाऊ विमान तैनात केले आहे. अमेरिकेला टक्कर देण्यासाठी चीनचा लष्कर, नौदल आणि हवाईदलाच्या आधुनिकीकरणाचा कार्यक्रम वेगाने सुरु आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग यांनी लष्कराच्या आधुनिकीकरणाला विशेष प्राधान्य दिले आहे.

चीनचे सध्या अत्याधुनिक पाणबुडी प्रकल्पाबरोबर उपग्रह विरोधी क्षेपणास्त्रांवर काम सुरु आहे. मागच्यावर्षी नोव्हेंबरमहिन्यात हवाई शो मध्ये चीनने पहिल्यांदा जगाला J-20 विमानाची झलक दाखवली. पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांना रडार पकडू शकत नाही. रडारला चकवा देण्याची क्षमता या विमानांमध्ये असते.

रडारवर दिसत नसल्यामुळे या विमानांचा नायनाट करणे एक आव्हान असते.

अमेरिकेच्या F-22 रॅपटर, F-35 प्रमाणे J-20 विमानांमध्ये रडारला चकवण्याची क्षमता आहे का ? ते अजून स्पष्ट झालेले नाही. 2014 च्या एअर शो मध्ये चीनने J-31 स्टेलथ फायटर विमान पहिल्यांदा जगासमोर आणले. अमेरिकेच्या F-35 विमानाला टक्कर देण्यासाठी चीन J-31 विमानाची निर्मिती करत आहे. चीनने नौदलाच्या प्रगतीवरही तितकेच लक्ष दिले आहे.

लोकमत

Saturday, 9 July 2016

भारताचा आदर्श घ्या - पीटीआय

सागरी वादांबाबत अमेरिकेचा चीनला सल्ला
वॉशिंग्टन - आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करत शेजारी देशांबरोबर असलेले सागरी वाद कसे हाताळावे, हे चीनने भारताकडून शिकणे आवश्‍यक आहे, असा टोमणा अमेरिकेने चीनला मारला आहे. दक्षिण चिनी समुद्रातील वादग्रस्त बेटांच्या संदर्भातील चीनच्या भूमिकेबाबत अमेरिकेने ही टिपण्णी केली आहे.

वादग्रस्त बेटांवर चीनने आपला हक्क सांगितला असून, फिलिपीन्ससह इतर सहा देशांनी चीनच्या या अरेरावीला आव्हान दिले आहे. याबाबतचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुरू असून, त्याचा निकाल बारा जुलैला अपेक्षित आहे. चीनने मात्र याप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाला निकाल देण्याचा अधिकार नसल्याची भूमिका घेतली असून, दिलेला निकाल मान्यही करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्‍वभूमीवर भारताचे उदाहरण देताना अमेरिकेच्या ईशान्य आशिया विभागाचे संरक्षण सचिव अब्राहम डेन्मार्क म्हणाले,""भारत आणि बांगलादेशदरम्यान सुरू असलेल्या सागरी वादाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयात 2014 मध्ये निकाल लागून तो भारताविरोधात गेला. भारताने शांतपणे हा निर्णय मान्य केल्याने आज त्या दोन्ही देशांचे संबंध विश्‍वासाचे आहेत. याचा त्या दोन्ही देशांना फायदा होत आहे. हा भारताचा आदर्श चीनने घेणे गरजेचे आहे.‘‘ अमेरिकेचे मोठे पाठबळ असून आणि स्वत: एक शक्तीशाली देश असूनही भारताने ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले, त्याबाबत त्यांचे कौतुकच करायला हवे, असेही डेन्मार्क यांनी सांगितले.