Showing posts with label श्रध्दांजली. Show all posts
Showing posts with label श्रध्दांजली. Show all posts

Wednesday, 27 July 2016

कारगिल युद्धातील हुतात्म्यांना 'सॅल्यूट' - नरेंद्र मोदी - - पीटीआय

नवी दिल्ली - तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने 1999 मधील कारगिल युद्धात खंबीरपणा दाखविल्यानेच भारताला नेत्रदीपक विजय मिळाला. या युद्धात देशासाठी ज्या जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना माझा "सॅल्यूट‘, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

कारगिल विजय दिनानिमित्त मोदी यांनी आज "ट्विट‘ केले. मोदी म्हणाले, ‘1999 मध्ये त्यावेळच्या सरकारने खंबीरपणे घेतलेल्या निर्णयाचा मला आजही अभिमान वाटतो. कारगिलमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शत्रूंना भारतीय जवानांनी जशास तसे दिलेले उत्तर अविस्मरणीय आहे. भारतीय लष्कराच्या धैर्याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि भारत या धैर्याला कदापी विसरणार नाही. शेवटच्या श्‍वासापर्यंत जे जवान लढले, ज्यांनी देशासाठी त्याग केला, त्यांची प्रेरणा आम्ही घेत राहू.‘‘
द्रास येथे श्रद्धांजली
लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्ट. जनरल डी. एस. हुडा यांनी आज जम्मू आणि काश्‍मिराच्या द्रास भागात कारगिल युद्धातील हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. द्रास येथील ऐतिहासिक स्मृतीस्थळाला हुडा यांनी भेट दिली. कारगिल युद्धात भारतीय लष्कराने केलेल्या नेत्रदीपक कामगिरीचा त्यांनी या वेळी गौरव केला. या वेळी लष्करातील अधिकारी आणि जवान उपस्थित होते.

Sunday, 6 December 2015

Our Real Heroes : Indian Army Soldiers

Respect & Big Salute...
Our Real Heroes : Indian Army Soldiers
3 Atankwadi ko marne ke baad Shahid hua, Bharat mata ke Veer Sapoot :
Shahid Bharat mata ke Laal ko Shat Shat Naman :
Shahidon ki chintao par lagenge har baras melee ...
Watan par mitne walo ka baki yahi nishan hoga
Jai hind. Jai jawan. Vande mataram. Bharat mata ki jai.

 

Saturday, 21 November 2015

शहीद संदीप संतोष ह्याळीज

भावपूर्ण श्रध्दांजली

 

बागलान तालुकयातील आखातवाडे गावातील भूमीपूत्र श्री संदीप संतोष ह्याळीज सीमेवर लढाईत वीरमरण आले. पार्थिव आज संध्याकाळपर्यंत आखातवाडे येथे आणण्यात येणार आहे.