Sunday 23 October 2016

तोपर्यंत पाक कलाकारांना व्हिसा देऊ नये - - वृत्तसंस्था

मुंबई - ‘जोपर्यंत दहशतवाद नष्ट होत नाही आणि पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारत नाहीत तोपर्यंत सरकारने पाकिस्तानमधील कलाकारांना व्हिसा देऊ नये‘, असे आवाहन सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पंकज निहलानी यांनी केले आहे.
वृत्तसंस्थेशी बोलताना निहलानी म्हणाले, "चित्रपट हे महत्त्वाचे माध्यम आहे. चित्रपटातून देशाला, लष्कराला आणि अर्थव्यवस्थेला काहीही धोका न पोचविण्याची जबाबदारी चित्रपट निर्मात्यांची आहे.‘ तसेच "या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून भारताचे कायदे अधिक सक्षम करावेत‘ असे आवाहनही निहलानी यांनी केले. उरी येथील हल्ल्यानंतर करण जोहर दिग्दर्शित पाक कलाकारांची भूमिका असलेल्या ‘ऐ दिल है मुश्‍किल‘ चित्रपटाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध दर्शविला. मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यराने या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

No comments:

Post a Comment