Tuesday 18 October 2016

'सर्जिकल' बदला घेण्याचा 'आयएसआय'चा प्लॅन - वृत्तसंस्था

नवी दिल्ली- काश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर संघटना ‘आयएसआय‘ नवा प्लॅन करत असल्याची माहिती पुढे आली आहे.

पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी सघंटनावर बंदी घालण्यात आल्यानंतर त्या निष्क्रीय झाल्या आहेत. निष्क्रीय झालेल्या संघटनांपैकी जैसे अल् उमर मुजाहिदीन, हरकत उल अंसार/मुजाहिदीन, अल बदल, इख्वाल उल मुजाहिदीन व अल जेहाद फोर्स यांना सक्रिय करण्यासाठी योजना आखल्या जात आहेत. शिवाय, या दहशतवादी संघटनांना भारतामध्ये हल्ले घडवून आणण्याची जबाबदारी सोपविण्यात येत आहे, अशी माहिती भारताच्या गुप्तचर संघटनेने अहवालाद्वारे दिली आहे.

‘काश्मीर खोऱयामध्ये 250 दहशतवाद्यांमध्ये 107 स्थानिक नागरिकांचा सहभाग आहे. सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ले घडवून आणण्यासाठी स्थानिकांची मदत होत आहे. स्थानिकांच्या मदतीने हल्ले घडवून आणण्याची योजना ‘आयएसआय‘ आखत आहे,‘ असेही गुप्तचर संघटनेने म्हटले आहे.

No comments:

Post a Comment