Friday 23 September 2016

भारताच्या महिला प्रतिनिधीने पाकला सुनावले

संयुक्त राष्ट्रसंघ- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाषण म्हणजे लांबलचक निंदात्मक भाषण होते, अशी थेट टीका करीत भारताच्या संयुक्त राष्ट्रसंघातील स्थायी मोहिमेतील प्रथम सचिव इनाम गंभीर यांनी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेच्या 71व्या सत्रात चर्चेदरम्यान प्रतिक्रिया देण्याचा अधिकार (राइट टू रिप्लाय) वापरत गंभीर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांच्या भाषणाची दखल सर्व माध्यमांनी घेतली.

दहशतवादाला खतपाणी घालण्यावरून पाकिस्तानवर हल्लाबोल केला. त्यांच्या भाषणात राजनैतिक औपचारिकता जास्त नव्हती, मात्र ते परिणामकारक ठरले.

‘प्राचीन काळातील शिक्षणाचे महान केंद्र असलेल्या तक्षशीलेची भूमी आता दहशतवाद्यांची शाळा, नंदनवन बनली आहे. दहशतवादी बनू इच्छिणाऱ्यांना आणि प्रशिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या जगभरातील तरुणांना पाकिस्तान आकर्षित करते! त्यांच्या विषारी अभ्यासक्रमाची फळे संपूर्ण जगाला भोगावी लागत आहेत.‘

No comments:

Post a Comment