Friday 30 September 2016

Jobs and Career

Indian Government Jobs - www.indgovtjobs.in

Link to Indian Government Jobs - Today Employment News


ITI Fresher Jobs 2016 (4147 Govt Jobs Opening)

Posted: 30 Sep 2016 12:15 AM PDT

Government of India various Public Sector Units (PSUs) and State Government Organizations  are looking for young and experienced ITI (Industrial Training Institutes) OR National Trade...

TVNL Recruitment 2016 Assistant, Computer Typist, Clerk (48 Vacancies)

Posted: 30 Sep 2016 12:04 AM PDT

Tenughat Vidvut Nigam Limited (TVNL), Ranchi (Jharkhand State) invites applications for the post of Lower Division Assistant, Computer Typist and Junior Account Clerk. The last date for submission of...

Haryana PSC Recruitment 2016 Apply Online (34 Vacancies)

Posted: 29 Sep 2016 11:38 PM PDT

Haryana Public Service Commission (HPSC), Panchkula invites Online applications for recruitment of Sub Divisional Officer, Senior Dental Surgeon, Chemist, Numismatic Officer, Deputy Superintendent of...

IOCL Recruitment 2016 Apply Online (252 Vacancies Opening)

Posted: 29 Sep 2016 10:10 PM PDT

Indian Oil Corporation Limited (IOCL) Paradip Refinery, Paradip invites applications from eligible candidates for engagement under Apprentices Act, 1961 / Apprentices Amendment Act, 1973 or as...

BPSC Recruitment 2016-17 Apply Online (642 Vacancies)

Posted: 29 Sep 2016 09:55 PM PDT

Bihar Public Service Commission (BPSC), Patna has published press release of 60th, 61st and 62nd Common Combined (Preliminary / Mains) Competitive Examination for recruitment of various...

KVS Vacancy 2016-17 Teachers Apply Online (6205 Vacancies)

Posted: 29 Sep 2016 09:48 PM PDT

Kendriya Vidyalaya Sangathan (KVS) invites Online Applications from Indian Citizens (Teachers) for filling up 6205 teaching staff Vacancies of the Principal, Post Graduate Teachers(PGTs), Trained...

BPCL Recruitment 2016-17 Apply Online (60 Vacancies)

Posted: 29 Sep 2016 09:42 PM PDT

Bharat Petroleum Corporation Limited (BPCL) (A Government of India Enterprise) Recruitment of Process Technician, Utility Operator and Utility Operator in Mumbai Refinery. The Online registration...

Police Jobs 2016 (12204 Vacancies Opening)

Posted: 29 Sep 2016 09:14 PM PDT

Indian National Candidates, who searching and seeking for Police Recruitment Vacancies, Find to get complete list of Latest Police Jobs here. IndGovtJobs Blog listing all Agencies Current Police...

Driver Jobs 2016 (2177 Govt Vacancies Opening)

Posted: 29 Sep 2016 08:55 AM PDT

Various Driver Jobs available in State / Central Government Organization and  Government Public Sector Companies. Heavy Motor Vehicle (HMV) / Light Motor Vehicle (LMV) License Holders are...

Sports Quota Govt Jobs 2016 (500 Vacancies Opening)

Posted: 29 Sep 2016 08:51 AM PDT

IndGovtJobs listing all type of Government Jobs for Indian Job Seekers. This Post Govt Jobs only for Sports Persons, Who have represented and performed a State, District and National Level National...

Agriculture Jobs 2016 (552 Govt Vacancies Opening)

Posted: 29 Sep 2016 08:38 AM PDT

Agriculture is a Backbone of Indian Economy, because more than 70 percent of Indian population jobs based on Agriculture and allied sectors. In this page dedicated to Agri jobs seekers of Agriculture...

भारताकडून 25 देशांना कारवाईची माहिती

नवी दिल्ली - भारतीय लष्कराने पाक व्याप्त काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात आज केलेल्या लष्करी कारवाईची माहिती सरकारने अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्ससह महत्त्वाच्या 25 देशांच्या राजदूतांना दिली. कोणत्या परिस्थितीत ही कारवाई करण्यात आली, याबाबत परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी "साउथ ब्लॉक‘मध्ये राजदूतांना ही माहिती दिली.

या वेळी जयशंकर म्हणाले, ‘लष्कराची आजची कारवाई म्हणजे दहशतवाद विरोधी कारवाईचे उत्तम उदाहरण आहे. जम्मू - काश्‍मीरसह, भारतीय शहरांवर हल्ला करण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आलेल्या दहशतवाद्यांवर ही कारवाई करण्यात आली. आणखी कारवाई करण्याची भारताची कोणतीही योजना नाही. मात्र लष्कर दहशतवाद्यांना आणखी हल्ले करू देणार नाही.‘‘

विशेष म्हणजे आज सकाळी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुसान राईस यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा केली. "लष्करे तैयबा‘ आणि "जैश ए महंमद‘ या संघटनेच्या दहशतवाद्यांवर पाकिस्तानने कारवाई करावी, असे अमेरिकेचे मत असल्याचे राईस यांनी या वेळी सांगितले

- - पीटीआय

भारत सिंधूला रोखणार !

आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची नाकेबंदी करणारा भारत आता सिंधू नदीचे पाणी तोडण्याच्या विचारात आहे. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, असा इशारा पंतप्रधान मोदी यांनी दिल्यानंतर पाक सरकारचे धाबे दणाणले आहेत. तब्बल 56 वर्षांपूर्वी भारत- पाक दरम्यान झालेला हा करार भारताने रद्द केल्यास पाकिस्तानचे वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही. जगातील सर्वांत उदारमतवादी पाणी वाटप करार म्हणून सिंधू करारास ओळखले जाते. जागतिक बॅंकेच्या पुढाकाराने 1960 मध्ये हा करार झाला होता. पाकिस्तानसोबत तीन युद्धे आणि त्यानंतर भारतामध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाल्यानंतरही भारताने हा करार कायम ठेवला होता. हा करार मोडल्यास आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याची धमकी पाक देत आहे. या करारान्वये सिंधूच्या उपनद्या असणाऱ्या बियास, रावी, सतलजवर भारताचे, तर सिंधू, चिनाब आणि झेलमवर पाकिस्तानचे नियंत्रण प्रस्थापित झाले आहे. पाकिस्तानला सिंधूच्या तीन उपनद्यांमधून 80 टक्के एवढे पाणी मिळते. पाकिस्तानातील बहुतांश कृषिक्षेत्र सिंचनासाठी सिंधूच्या उपनद्यांवर अवलंबून आहे.
सिंधूबाबत भारताची भूमिका ?
भारत सरकार आंतरमंत्रालयीन समितीच्या माध्यमातून कराराचा पुनर्विचार करत असून, सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांवर हक्क सांगण्याचा भारताचा विचार आहे. या उपनद्यांवर बांध आणि मोठे प्रकल्प उभारून पाकिस्तानचे पाणी तोडण्याचा भारताचा विचार आहे. सिंधू जल आयोगात दोन्ही देशांच्या प्रतिनिधींचा समावेश असून, ते केवळ दहशतमुक्त वातावरणामध्येच काम करू शकतात.

शस्त्रक्रिया

आक्रमक कारवाई करून पाकिस्तानने चालविलेल्या छुप्या युद्धाला भारताने उघड प्रत्युत्तर दिले आहे. यातून दिसलेला कणखरपणा हा पाकिस्तानसाठी एक महत्त्वाचा संदेश आहे.
भारतीय सैन्याने पाकिस्तानव्याप्त काश्‍मिरातील दहशतवाद्यांच्या छावण्यांवर थेट हल्ले चढविले. तेथील कांगावखोर मुलकी सरकार आणि भारताशी वैर करण्यात मग्न असलेले लष्कर या दोघांनाही हा सणसणीत तडाखा आहे. पाकिस्तानने चालविलेल्या छुप्या युद्धाला दिलेले हे थेट आणि उघड प्रत्युत्तर आहे. अशा "सर्जिकल स्ट्राइक‘चा गाजावाजा करावा की नाही, यावर चर्चेचा रतीब घातला जाईल. मात्र भारतातील जनभावना पाहता सरकार गप्प नाही, प्रसंगी नियंत्रणरेषेपलीकडे जाण्याचा कणखरपणा दाखवू शकते, हा संदेश देणे सरकारसाठी गरजेचे होते. भारताकडून अशी कारवाई झाल्यानंतर यातील नामुष्की स्पष्ट असल्यानेच "अगा जे घडलेचि नाही‘, असा पवित्रा पाकिस्तानने घेतला. दहशतवाद्यांचा वापर करायचा, स्वतः नामानिराळे राहायचे आणि काश्‍मिरींच्या भल्याचा मक्ता आपल्याकडेच असल्याचे जगाला भासवायचे, या कपटनीतीलाही भारताने चपराक लगावली आहे. संयमाचा उपदेश प्रत्येक वेळी भारताला करण्याने उपखंडातील पेच मिटणार नाही, याचीही अमेरिकी महासत्तेला आणि जगाला जाणीव करून दिली. सतरा जवानांचा घास घेणाऱ्या दहशतवादी हल्ल्याचे "उरी‘चे शल्य केवळ लष्करालाच नव्हे, तर साऱ्या देशवासीयांना डाचत होते. आणखी किती काळ असे अपमान गिळत राहायचे, या प्रश्‍नाने साऱ्यांनाच अस्वस्थ केले होते. या अस्वस्थतेचा दबाव सरकारवर स्वाभाविकपणे निर्माण झाला. मुळात नरेंद्र मोदी यांचे सरकार जशास तसे उत्तर देण्याचे समर्थन करत सत्तेवर आल्याने उरीच्या हल्ल्यानंतरही मुत्सद्देगिरीची नेहमीची भाषा लोकांच्या पचनी पडणारी नव्हती, उलट त्यावर संतापच व्यक्त होत राहिला. आपल्याच प्रतिमेचे हे ओझेही सरकारला वागवावे लागणे अनिवार्य आहे. सर्वंकष युद्ध हा पर्याय नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकाकी करण्यातल्या मर्यादाही स्पष्ट आहेत. दुसरीकडे हे सरकारही काही करत नाही, अशी भावना मूळ धरते आहे. या स्थितीत सरकारने दहशतवाद्यांच्या घुसखोरीची माहिती मिळाल्याचे निमित्त करून आक्रमक कारवाईचा पर्याय निवडल्याचे दिसते. कारगिल संघर्षाच्या वेळी देखील भारताने नियंत्रणरेषा ओलांडली नव्हती, हे लक्षात घेतल्यास या कारवाईचे महत्त्व लक्षात येते. नेहमी पाकिस्तानसोबत चर्चेचे समर्थन करणारा देशातील वर्गही पाकिस्तानला समजेल अशा भाषेत बोलायला हवे, या मनःस्थितीत दिसत होता. या वातावरणात पुढे पाऊल टाकून दहशतवाद्यांचे अड्डे उद्‌ध्वस्त करण्याची कारवाई या नवभावनेला प्रतिसाद देणारीही आहे. या कारवाईसाठी राजकीय इच्छाशक्तीचे पाठबळ उभे करून सरकारने आणि सरकारच्या या कृतीला पाठिंबा देऊन कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी व्यापक राष्ट्रीय वृत्तीचे दर्शन घडविले. उरीनंतर भारत-पाकिस्तान संबंधांचे स्वरूप कायमचे बदलल्याचेही या कारवाईने अधोरेखित झाले.


पठाणकोट येथे पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने दहशतवादी हल्ला झाल्यानंतरही भारताने प्रामुख्याने राजनैतिक पातळीवरच प्रश्‍न हाताळला होता. दहशतवादधार्जिण्या पाकिस्तानचे अंतरंग जगापुढे उघड करणे, हल्ल्यातील पाकिस्तानी लष्कराच्या सहभागाचे पुरावे पाकिस्तानला देणे, त्या देशावर अन्य मार्गांनी दबाव आणणे हाच मार्ग भारताने पत्करला होता. हा देश थेट कारवाई करण्याचे टाळतो आहे, याचाच अर्थ त्याच्यात ते धाडस नाही, असा उफराटा अर्थ बहुधा पाकिस्तानने घेतला होता. त्यामुळेच पुन्हा उरीमध्येही हल्ल्याचा कट रचला गेला. पाकिस्तानच्या विरोधात सरकारने राजनैतिक मार्गांचा वापर सुरू केला होताच. त्या देशातील दक्षिण आशियाई विभागीय सहकार्य परिषदेवर (सार्क) भारताबरोबरच बांगलादेश, अफगाणिस्तान आणि भूतान यांनीही बहिष्कार घातला, हे त्या प्रयत्नांचेच एक फलित. आपली बाजू सत्य आहे, याची खात्री असली तरी तेवढे पुरेसे नसते, ते जगाला पुन्हापुन्हा ओरडून सांगावेही लागते. सरकारने तो प्रयत्न केला. भारताची ही तयारी पाहून पाकिस्तानी नेत्यांचे धाबे दणाणले होते, त्यामुळेच अण्वस्त्रांचा वापर करू, अशी दर्पोक्ती करण्यापर्यंत त्यांची मजल गेली असावी. अशा धमक्‍यांनी भारतीयांना नमविता येईल, हा त्यांचा होरा मात्र पूर्णपणे चुकला.


या लष्करी कारवाईचे स्वरूप मर्यादित ठेवण्यातही भारताने सुज्ञपणा दाखविला आहे. दहशतवाद्यांचा खातमा करून तसे पाकिस्तान सरकारला रीतसर कळविण्यात आले. आता याच्याविरोधात जर पाकिस्तान काही करू पाहील तर तो दहशतवाद्यांचा उघडउघड समर्थक आहे, हेच सिद्ध होईल. बेभान होऊन युद्धखोरी करण्याऐवजी नेमकी आणि परिणामकारक कारवाई करण्याचा मार्ग लष्कराने अवलंबला. मात्र युद्धाच्या उन्मादाचे वातावरण निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. आर्थिक विकासाच्या ज्या आकांक्षा घेऊन भारत वाटचाल करीत आहे, त्यांच्यावर पाणी फेरले जाणे परवडणारे नाही. या कारवाईनंतर पाकिस्तानातील लष्कर मुलकी सरकारला आणखीनच झाकोळून टाकण्याची शक्‍यता आहे. भारताच्या या कृतीनंतर हा नेहमीचा गोळीबार असा पवित्रा पाकने घेतला असला, तरी त्याची तीव्रता लपणारी नाही. या आक्रमक पवित्र्याविरोधात पाककडून काही ना काही कृती होईलच. यातून सर्वंकष युद्धाचा भडका उडू नये, याची काळजी घ्यायला हवी; तसेच पाकिस्तानच्या घातपाती कारवायांविषयी अखंड सावधच राहावे लागेल.

- - सकाळ वृत्तसेवा

व्यूहरचनात्मक कोंडीत पाकिस्तान - एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त)

 

पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये केलेल्या नियंत्रित हल्ल्याने पाकिस्तानला व्यूहरचनात्मक, आर्थिक, राजकीय आणि लष्करी कोंडीत पकडले आहे. अशा हल्ल्यासाठी सक्षम गुप्तचर यंत्रणा आणि अचूक नियोजन आवश्‍यक असते.

पाकव्याप्त काश्‍मीरमधील दहशतवाद्यांच्या तळावर केलेला नियंत्रित हल्ला म्हणजे माझ्या दृष्टीने उरीतील सतरा हुतात्मा जवानांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. योग्य वेळी नेतृत्वाने केलेली ही कारवाई आहे. जगात उच्छाद मांडलेल्या दहशतवादाविरुद्ध हा नियंत्रित हल्ला केला आहे. उरीच्या हल्ल्यानंतर व्यूहरचनात्मक गोष्टी सुरू होत्या. संयुक्त राष्ट्र संघातही यावर चर्चा झाली. तसेच, इतर देशांच्या व्यासपीठावरही हा ज्वलंत प्रश्‍न मांडण्यात आला.

नियंत्रित हल्ल्यासाठी शत्रूच्या गोटातील अचूक माहिती आवश्‍यक असते. त्यात सामान्य नागरिकाचा मृत्यू होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे भारतीय लष्कराने उरी हल्ल्यानंतर कोणताही उतावळेपणा दाखविला नाही. हवामानासह प्रत्येक बारीक-बारीक गोष्टीचा अभ्यास करून या हल्ल्याचे नियोजन केले होते.

नियंत्रित हल्ले म्हणजे काय?

नियंत्रण रेषेच्या पलीकडे पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांचे तळ आहेत. तेथे त्यांना प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ आणले जाते आणि त्यांच्या माध्यमातून भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ले किंवा वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी हल्ले केले जातात. या दहशतवादी तळांची इत्थंभूत अचूक माहिती भारतीय लष्कराने मिळविली. गुप्तचर यंत्रणेकडून दहशतवादी तळांची माहिती मिळाल्याने त्यांच्यावर हल्ला केला. गुप्तचर यंत्रणांमध्ये अत्याधुनिक साधनेही वापरली जातात. त्यामुळे सर्व अभ्यास करून भारतीय लष्कराने हा हल्ला केला. स्पेशल फोर्सेसने ही कारवाई केली. त्यांना हेलिकॉप्टरने पटकन दहशतवादी तळांवर उतरले आणि ही कारवाई पूर्ण केली. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये ही कारवाई केली.

पाकिस्तानचा दुतोंडी व्यवहार

पाकिस्तान लष्कराकडून पुरस्कृत केलेला दहशतवाद, असे वारंवार आपण जागतिक समूहाला सांगितले आहे; पण प्रत्येक वेळी पाकिस्तानने हे फेटाळले. एकीकडे पाकिस्तान दहशतवादाला मदत करत नाही, असे सांगितले जाते; मग दुसरीकडे भारताने कारवाई केली तर पाकिस्तान लष्कराने त्याला पाठिंबा दिला पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दहशतवादाच्या विरोधात बातचीत करायची, आमचा देश दहशतवादी हल्ल्यांनी होरपळत आहे, असे चित्र निर्माण करायचे, अशी दुटप्पी भूमिका पाकिस्तानने ठेवली आहे. जगभरात झालेल्या हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांना पाकिस्तानातून प्रशिक्षण मिळाले आहे, हे सर्वांना माहीत आहे. पाकिस्तान स्वतः म्हणतो, की आम्हाला दहशतवाद नको. त्यामुळे पाकिस्तानचा व्यवहार हा दुतोंडी आहे.

जगभरातून भारताला पाठिंबा

जागतिक मत भारताच्या बाजूला आहे. कोणताही अभिमान असलेला देश सारखा मार खात बसत नाही. त्यामुळे आपण आपले संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. दुसरे देश सारखे आपल्या मदतीला येणार नाहीत. आपल्याला जगभरातून नक्कीच पाठिंबा आहे. त्याबाबत तसे जागतिक मत आपण तयार केले आहे. प्रत्येक वेळी पाकिस्तानने दहशतवादी हल्ल्यांना नाकारले आहे. पाकिस्तानी लष्कराचा भस्मासुर झालेला आहे. ते फक्त लष्कर नाही, तर त्यांनी स्वतःच तयार केलेली आर्थिक शक्ती आहे. प्रत्येक व्यवसायात लष्कर असते. प्रत्येक महत्त्वाचे पद धरून पाकिस्तान सरकार चालविले जाते. बांगलादेशानेही या कामगिरीचे समर्थन केले आहे. दहशतवादाच्या विरुद्ध केलेल्या कारवाईचे प्रत्येक देश समर्थन करेल.

स्पष्ट राजकीय संकेत

लष्कराने आज केलेल्या कारवाईतून पाकिस्तानला खूप मोठा राजकीय संदेश दिला आहे. देशातील सर्व पक्षांनी या कारवाईला एकमुखी पाठिंबा दिला आहे. संपूर्ण देश याच्या मागे ठामपणे उभा आहे. सशस्त्र सेनेच्या मागे कोणतीही राजकीय भूमिका नसते. ते फक्त राजकीय नेतृत्वाच्या होकाराची वाट पाहत असतात. हे इतक्‍या दिवस काही आपण करत नव्हतो; पण दहशतवादाला प्रत्युत्तर देण्यासाठी आता व्यूहरचनात्मक, आर्थिक, राजकीय आणि लष्करी असे वेगवेगळे पर्याय आपल्याकडे आहेत. वेळ लागली तर हे पर्याय आपण वापरू, असेही यातून स्पष्ट होते.

पुढे काय होईल?

पाकिस्तान हा सहजासहजी ऐकणारा देश नाही. ते खूप आरडा-ओरडा करणार. त्यांचे लष्कर आता ‘बॅक फुट’वर आहे. भारतीय लष्कर हे पाऊल उचलू शकते, असे त्यांना समजले आहे. आपल्या पुरस्कृत दहशतवादावरच हल्ला चढविला आहे. त्यामुळे ते अजून दहशतवादी हल्ल्यांचा प्रयत्न करणार. त्यांना लढाई करायची नाही. त्यांना दहशतवादी छुपे हल्ले करायचे आहेत. अण्विक शक्ती ही भयंकर आहे.

(शब्दांकन - योगीराज प्रभुणे)

पाकिस्तानविरुद्ध शिवरायांची नीती प्रभावी - कर्नल सुरेश पाटील


पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईबद्दल लष्कराचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. अत्यंत कौतुकास्पद आहे. उरी हल्ल्यानंतर तडकाफडकी प्रतिक्रिया न देता भारताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीचा केलेला अवलंब प्रभावी आहे. या कारवाईबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करायला हवे.

या परिस्थितीत थेट युद्धासाठी आव्हान देणे योग्य ठरणार नाही. मात्र, या कारवाईमुळे देशवासीयांमधील संतापाला वाट मिळेल. आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत राजनैतिक धोरण परिणामकारक ठरत असताना ताबडतोब आव्हान न देता, पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी ही युद्धनीती उपयुक्त ठरेल. त्यामुळे या हल्ल्याबद्दल भारताला दोष देऊ शकणार नाहीत. अन्यथा घाईत दिलेली प्रतिक्रिया म्हणजे अपरिपक्व कारवाई वाटली असती. मागील काही वर्षांमधील प्रगतीमुळे भारताचे स्थान उंचावलेले आहे. त्याला साजेशी अशी कारवाई करण्यासाठी मोदींनी शिवाजी महारांजांची नीती वापरली आहे.

अशा हल्ल्यात कमीत कमी वेळात शत्रूचे जास्त नुकसान केले जाते. शस्त्रांचे आगार (कोट) व दारूगोळा साठविण्याची ठिकाणे उडविली जातात.

थेट युद्धाने देश 50 वर्षे मागे जाईल!

सर्जिकल स्ट्राइक अतिशय योग्य असून, त्यामुळे आपली हानी कमी होते. या उलट थेट युद्ध केल्यास ते पाच दिवस जरी झाले तर भयंकर खर्च होतो. तसे युद्ध केल्यास अर्थव्यवस्थेवर ताण येऊन पेट्रोल होईल 200 रुपये लिटर, आणि दूध होईल 100 रुपये प्रतिलिटर. युद्धामध्ये अमाप दारूगोळा वापरावा लागतो. एका तोफगोळ्यासाठी दोन हजार ते लाखो रुपयांपर्यंत खर्च होतो. 100 मीटर ते काही किलोमीटर अंतरापर्यंतचा पल्ला गाठणारे हे गोळे असतात. काही वेळातच कोट्यवधी रुपयांचे नुकसान होईल, आणि युद्ध करणारा देश 50 वर्षांनी मागे जाईल.

दोन्ही देशांमध्ये 80 टक्के जनता ही कमी उत्पन्न असणारी आहे. युद्ध आणि शस्त्रास्त्र स्पर्धांमुळे अधिकाधिक खर्च होत राहतो. देशाच्या अर्थव्यवस्थेवरील ताण वाढतो. क्युबा देशामध्ये 20 टक्के खर्च शिक्षणावर केला जातो. आपल्याकडे हे प्रमाण दीड टक्का एवढे कमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही युद्ध करताना रयतेचे नुकसान होणार नाही याची खबरदारी नेहमी घेतली. रयतेच्या कल्याणाला प्राधान्य देण्याची त्यांचे धोरण होते.

आत्मघातकी हल्ल्यांपेक्षाही प्रभावी...

दोन पाकिस्तानी दहशतवादी येऊन हल्ला करतात, आणि आपला देश हालवून टाकतात. आपणही तसे हल्ले पाकच्या हद्दीत घडवून आणू शकतो, परंतु आपल्याला लौकिकाला ते साजेसे ठरणार नाही. हानी टाळण्यासाठी ही सर्जिकल पद्धत योग्य ठरते.

शत्रूची ठाणी आणि दारुगोळा उद्ध्वस्त करणे हे परिणामकारकता वाढविण्यासाठी आवश्यक आहे. अशा हल्ल्यांमध्ये नुकसान करून परत येऊ शकतो. हल्ला केलेल्या ठिकाणाजवळ छोटी गावे असतात, तिथे राहून हल्ला घडविण्याचे एक तंत्र आहे, मात्र भारतीय सैन्याची तिथे ताबडतोब ओळख पटू शकते, त्यामुळे ते तंत्र धोकादायक आहे. पाकपुरस्कृत दहशतवादी मात्र काश्मीरमधील फुटीरवाद्यांच्या मदतीने असे हल्ले घडवून आणतात.

दहशतवाद्यांनी वापरले अत्याधुनिक तंत्र...

उरी येथे झालेल्या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी अत्याधुनिक फॉस्फरस ग्रेनेडचा वापर केला. हा हल्ला अतिशय नियोजनपूर्वक केल्याचे स्पष्ट होते. हे ग्रेनेड टाकल्यावर त्याचे तुकडे उडतात, त्यातून फॉस्फरस गॅस बाहेर उडतो. त्याचा धूर होतो, शरीरावर किंवा कापडावर ते उडताच आगीचा भडका होतो. उरी हल्ल्यात  जवान आगीमध्ये होरपळून हुतात्मा झाले, त्यावरून तिथे असेच फॉस्फरस ग्रेनेड वापरल्याचे दिसते.

भारतीय सैन्याचेही नुकसान शक्य...

या हल्ल्यात आपल्या बाजूला किती हानी झाली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भारतीय सैन्याचेही काही नुकसान झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, सीमेलगतच्या भागात भूमिगत सुरुंग (लँडमाइन) पेरलेले असतात, त्यामुळे त्या ठिकाणी जाताना व्यक्तीसोबत, जीपसारखी वाहने आणि रणगाडेसुद्धा उद्धवस्त करण्याची क्षमता असते. तसेच, पाककडून गोळीबारामुळेही हानी झालेली असेल.

खरंच युद्ध करायचं का?

युद्ध करा हे बोलणे खूप सोपे आहे. परंतु, सीमेवर लढताना आम्ही स्वतः मृत्यू जवळून पाहिला आहे. ज्याचा मुलगा युद्धात गेला आहे त्या आईला विचारा युद्ध हवंय का? जिचा नवरा युद्धात हुतात्मा झालाय त्या पत्नीला विचारा युद्ध हवे आहे का? हुतात्मा कर्नल महाडिक यांच्या घरी मी गेलो होतो, तेव्हा पत्नी गाईसारखा हंबरडा फोडत होती. ते पाहवत नव्हते.

- कर्नल सुरेश पाटील

'आसुर' मर्दन!

‘एलओसी’ओलांडून सर्जिकल स्ट्राइक; उरी हल्ल्याचा घेतला बदला

नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरमधील उरीच्या लष्करी तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ११ दिवस संयम बाळगलेल्या भारताने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. लष्कराच्या विशेष जवानांनी काल मध्यरात्रीपासून आज पहाटेपर्यंत केलेल्या पाच तासांच्या लक्ष्यवेधी कारवाईत (सर्जिकल स्ट्राइक) नियंत्रण रेषेपलीकडील दहशतवाद्यांचे सात तळ उद्‌ध्वस्त केले. या कारवाईत किमान ३५ ते ४० दहशतवादी आणि पाकिस्तानचे नऊ सैनिक ठार झाले.

पाकिस्ताव्याप्त काश्‍मीरमध्ये जमलेल्या दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानी नेतृत्वाला हा इशारा मानला जातो. काल (ता. २८) मध्यरात्री सुरू झालेली ही कारवाई आज पहाटे साडेचारच्या सुमारास समाप्त झाली. नियंत्रणरेषा ओलांडून भारताने प्रथमच अशी कारवाई केली आहे. या कारवाईत हवाई दलाचेही सहकार्य होते. उरीतील लष्कराच्या ब्रिगेड मुख्यालयावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १८ जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची मागणी जोरात होती. ‘उरीच्या हल्लेखोरांना शिक्षा दिली जाईल आणि १८ जवानांचे हौतात्म्य आम्ही विसरणार नाही,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते, तसेच हल्ल्याचे ठिकाण आणि वेळ लष्कर ठरवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार लष्कराच्या विशेष जवानांनी ही कारवाई यशस्वी केली. उरीतील हल्ल्यानंतर व्याप्त काश्‍मीर व नियंत्रणरेषेपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरील भागात एक आठवड्यापासून लक्ष केंद्रित करण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली, तर कुपवाडा आणि पूंचजवळच्या नियंत्रणरेषेजवळील पाच-सहा ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी सांगितले.

अर्थात लष्कराने कारवाईचा तपशील देण्याचे टाळले असले, तरी यात दहशतवाद्यांची आणि त्यांच्या पाठीराख्यांची लक्षणीय प्रमाणात हानी झाल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे ही मोहीम सुरू ठेवण्याची कोणतीही योजना नाही, असेही लष्करातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

लष्कराने काल मध्यरात्री नियंत्रण रेषेपलीकडे पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवाद्यांचे तळ उद्‌ध्वस्त करण्यासाठी केलेली कारवाई यशस्वी झाल्यानंतर याची माहिती तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हे यावर लक्ष ठेवून होते, असे कळते. यानंतर पंतप्रधान मोदींनी आज सकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन या कारवाईची माहिती दिली. तसेच सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनाही सरकारतर्फे याबाबत माहिती देण्यात आल्याचे समजते. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयातर्फे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या कारवाईची औपचारिकरीत्या घोषणा करण्यात आली. लष्करी कारवाई विभागाचे महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग आणि परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ही पत्रकार परिषद घेतली. पाकिस्तानी हद्दीमध्ये असलेल्या तळांवर मोठ्या प्रमाणात दहशतवादी जमा झाले असून, त्यांची घुसखोरी रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी निवेदनात स्पष्ट केले. अर्थात ही पत्रकार परिषद निवेदनापुरतीच मर्यादित राहिली.

लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी प्रारंभी उरी आणि पूंछमधील हल्ल्यांची पार्श्‍वभूमी विशद केली. नियंत्रण रेषेजवळील तळांवर मोठ्या संख्येने जमा झालेल्या दहशतवाद्यांचा घुसखोरी करण्याचा आणि जम्मू-काश्‍मीर व देशातील महानगरांमध्ये हल्ले घडवून आणण्याचा त्यांचा डाव आहे, अशी विश्‍वसनीय आणि अचूक माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराने या तळांवर लक्ष्याधारीत हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) केले. या संभाव्य घुसखोरीमुळे भारतीय नागरिकांची जीवितहानी होऊ नये या उद्देशानेच लष्कराने ही कारवाई केली, असे त्यांनी सांगितले.

या कारवाईमध्ये दहशतवाद्यांचे आणि त्यांच्या पाठीराख्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर ही कारवाई थांबविण्यात आली आहे. पुन्हा अशी कारवाई करण्याची लष्कराची कोणतीही योजना नाही. परंतु, कोणत्याही प्रकारचा आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सदैव सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या कारवाईची माहिती पाकिस्तानी ‘डीजीएमओ’ यांना देण्यात आल्याचे सांगताना लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग म्हणाले, की शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. मात्र दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेपलीकडे राहून कारवाया कराव्यात आणि आपल्या नागरिकांवर हल्ले करत राहावे हे खपवून घेतले जाणार नाही. दहशतवाद्यांना भारताविरुद्ध कारवायांसाठी आपल्या भूप्रदेशाचा वापर करू दिला जाणार नाही, या २००४ मध्ये पाकिस्तानने दिलेल्या ग्वाहीची त्यांनी पाकिस्तानला आठवण करून दिली.

उरी येथे लष्कराच्या मुख्यालयावर १८ सप्टेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये १८ जवानांना हौतात्म्य पत्करावे लागल्याने देशभरात संतापाची लाट उसळली होती. तसेच, पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी सरकारवर वाढत्या दबावानंतर काल मध्यरात्री लष्कराने दहशतवाद्यांना धडा शिकवला. गेल्या वर्षी भारतीय लष्कराने म्यानमारच्या हद्दीत शिरून नागा दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई केली होती. त्यानंतर कालच्या कृतीने भारतीय लष्कराची सक्षमता पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. यामध्ये लष्कराच्या तुकड्या आणि हेलिकॉप्टरचा वापर झाल्याचे समजते.

पुन्हा अशी कारवाई करण्याची लष्कराची कोणतीही योजना नाही; परंतु, कोणत्याही प्रकारचा आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सदैव सज्ज आहे.

- लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग, महासंचालक, लष्करी कारवाई

सर्जिकल स्ट्राइक म्हणजे काय?

नियोजनबद्ध आणि नेमकेपणाने केलेल्या लष्करी कारवाईला ‘सर्जिकल स्ट्राइक’ म्हटले जाते. या कारवाईमध्ये जे लक्ष्य असते, त्यावरच थेट हल्ला केला जातो. आजूबाजूच्या कोणालाही या हल्ल्यामुळे नुकसान पोचणार नाही, याची काळजी यामध्ये घेतली जाते. ‘सर्जिकल स्ट्राइक’मध्ये कायद्याअंतर्गत बसणाऱ्या गोष्टींचा विचार करूनच शत्रूच्या तळावर हल्ला केला जातो. यामध्ये कोणतीही वाहने, इमारती अथवा सार्वजनिक पायाभूत सुविधांची किंवा उपयुक्त गोष्टींची हानी होणार नाही याचीही खबरदारी घेतली जाते. ठरलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊन विमानातून बाँबहल्ला करणे हे ‘सर्जिकल स्ट्राइक’चे योग्य उदाहरण म्हणता येईल. जमिनीवरून बाँबहल्ला करण्याच्या हे अगदी विरुद्ध आहे.

अशी झाली कारवाई...

विशेष कृती दलाने बुधवारी (ता. २८) रात्री १२.३० ते पहाटे ४.३० या दरम्यान पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये दोन किलोमीटर आतपर्यंत असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांवर ही कारवाई केली.

जवानांना उतरविण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत

व्याप्त काश्‍मीरमधील भिंबर, हॉटस्प्रिंग, केल आणि लिपा सेक्‍टरमध्ये ही कारवाई झाली.

किमान १५० जवानांना या ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे उतरविण्यात आले.

पर्रीकर, दोवाल यांचे कारवाईवर लक्ष

अत्यंत नियोजनबद्ध चाल करत जवानांनी सात दहशतवादी तळ नष्ट केले.

भारताची हानी नाही; मात्र किमान ३८ दहशतवादी ठार.

कारवाईनंतर...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची तातडीची बैठक.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची भेट घेऊन मोदींनी दिली लष्करी कारवाईची माहिती.

उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी यांनाही दिली माहिती.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनाही याविषयी सांगितले.

गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सोनिया गांधींसह सर्व प्रमुख राजकीय नेत्यांना या कारवाईबाबत माहिती दिली.

सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही केंद्रीय गृहमंत्र्यांनी लष्करी कारवाईबाबत कळविले.

राजनाथसिंह यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक.

पाककडून हल्ल्याची शक्‍यता लक्षात घेऊन पंजाब, राजस्थानमधील सीमेला लागून असलेल्या गावांतील नागरिकांचे स्थलांतर.

जम्मू आणि काश्‍मीरमध्येही याच पद्धतीची दक्षता.

हल्ला झाल्याचा पाकिस्तानकडून इन्कार; नऊ सैनिक ठार झाल्याचा दावा

संकेत धुडकावून भारताने आक्रमण केल्याचा नवाझ शरीफ यांचा कांगावा

पुढच्या वेळी आम्ही उत्तर देऊ - ख्वाजा असिफ यांची धमकी

- - सकाळ न्यूज नेटवर्क

तोफेच्या तावडीत सापडूनही जिवंत - कर्नल सुरेश डी. पाटील

युद्धाचे कथानक अथवा कथा ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी उत्सुकता जगभर सर्वत्र आढळते. युद्धाचे अनुभव रम्य असतात, तसेच तितकेच भयानकही असतात. माझे अनुभव मी काही माझा अहंकार म्हणून सांगत नाही, तर ते माझे अलंकार म्हणून सांगत आहे. अलंकार अशा अर्थाने, की माझ्या उभ्या आयुष्यात देशासाठी केलेली ती छोटीशी पण प्रामाणिक सेवा आहे.

भारतीय सेनेमध्ये माझा प्रशिक्षण कालावधी पूर्ण करून 1969 ला राजौरी येथे 14 ग्रेनेडियर रेजिमेंटमध्ये रुजू झालो. सैनिकी जीवनामधील प्रामुख्याने तीन लहान-मोठ्या घटना माझ्या मनावर कधीही न विसरण्यासाठी कोरल्या गेल्या आहेत.

पहिली घटना म्हणजे माझ्या कमांडिंग ऑफिसरने केलेला उपदेश. ‘माणसांच्या जीवनामध्ये काहीना काही महत्त्वाकांक्षा, लक्ष्य, उद्दिष्टे असावीत.‘ ज्या वेळी माझे प्रशिक्षण सुरू होते, त्या वेळी आमच्या कमांडिंग ऑफिसरनी वरील आशयाचा कानमंत्र आम्हाला दिला. तो कानमंत्र असा की, प्रत्येक सैनिकाने उराशी दोन महत्त्वाकांक्षा बाळगाव्यात. एक म्हणजे प्रत्येक सैनिकाने ‘जनरल‘ व्हावयाचे व दुसरी महत्त्वाकांक्षा म्हणजे प्रत्येक सैनिकाने आपल्या सैनिकी जीवनामध्ये एकदा तरी युद्धाला सामोरे जायचे. अर्थात, प्रत्येक सैनिक काही ‘जनरल‘ होऊ शकणार नाही; परंतु केव्हा ना केव्हा आपल्या देशासाठी त्याला युद्धाचा अनुभव घेता येतो आणि मीसुद्धा माझ्या सैनिकी जीवनामध्ये युद्धाचा अनुभव घेतलेला आहे व माझी दोन्हीपैकी एक महत्त्वाकांक्षा पुरी केली आहे.

दुसरी घटना 1971 मध्ये भारत-पाक युद्धाला तोंड फुटले तेव्हाची. 14 जून 1971 रोजी बंगालमधील ‘तुरा‘ या ठिकाणी युद्ध आघाडीवरील ‘मुक्ती वाहिनी‘ नामक सैनिकी तुकडीमध्ये माझी पी.ओ.डब्ल्यू. (प्रिझनर ऑफ वॉर) कॅम्प ऑफिसर इन्चार्ज म्हणून जबाबदारीच्या पदावर बदली करण्यात आली. त्या वेळी युद्धात बरेच पाकिस्तानी युद्धकैदी मिळाले होते. त्यापैकी माझा पहिला युद्धकैदी होता पाकिस्तानी ब्रिगेडिअर! त्याला घेऊन मला कोलकत्याला जावे लागले. त्या विमानप्रवासात त्याच्याशी बरीच चर्चा करता आली व महत्त्वाची माहितीही घेता आली. पुढे ते विमान गुवाहाटी विमानतळावर उतरले. पुढील बदली विमान मिळण्यासाठी आम्हाला आठ तास अवकाश होता. या आठ तासांत तो नजरकैदी म्हणून त्याच्यावर मला बारकाईने लक्ष ठेवावे लागले होते. याच आठ तासांत त्याने आपल्या बऱ्याच आठवणी मला कथन केल्या. पाकिस्तान व भारतीय सैन्यात तसा काही बराचसा फरक नाही व त्या ब्रिगेडिअरचा मी आमच्या ब्रिगेडिअरसारखा सन्मान व आदर केला. त्याच्या मनात सर्व भारतीयांबद्दल खरेच प्रेम राहील असेच वागलो आणि त्याने तसे म्हणून दाखविले. अर्थात तो युद्धकैदी! आणि म्हणून त्याच्याशी केलेली चर्चा व त्याने माझ्याशी केलेली चर्चा हा प्रसंग तसा दुर्मिळच म्हणावा लागेल.

माझ्या मनावर कोरली गेलेली तिसरी घटना 1971 च्या युद्धाची. अर्थात माझ्या पुनर्जन्माचीच! परमेश्‍वराने मला त्या मृत्यूच्या भयानक तांडव नृत्यातून बाजूला खेचले होते. त्याचे असे झाले - ‘14 ग्रेनेडियर रेजिमेंट‘ येथील 6 अधिकारी युद्धात मारले गेले. फारच भयानक घटना घडली होती ती. माझी तातडीने ‘तुरा‘हून राजौरी येथे बदली करण्यात आली. मला हे एक आव्हानच होते. कारण, माझी नेमणूक सैनिकी मोर्चावर झाली होती. आम्ही जी शस्त्रे, अस्त्रे वापरत होतो, तशाच प्रकारचा शस्त्रांचा व अस्त्रांचा वापर शत्रू पक्षाकडून होत होता. आपल्यासारखाच उखळी तोफांचा वापर शत्रू पक्षाकडून सर्रास होत होता. रात्र वर चढत होती. सर्वत्र काळोख दाटला होता. रात्री अकराच्या सुमारास आमचा होरा चुकला व आम्ही शत्रूच्या उखळी तोफेचे लक्ष्य बनलो. शत्रूच्या उखळी तोफेतून सुटलेला एक गोळा अचानक माझ्यासमोर एक मीटर अंतरावर येऊन आदळला. मला काही समजायच्या आतच त्याचा महाभयंकर असा स्फोट झाला. त्याच्या ठिकऱ्या, त्याचे कण माझ्या शरीरात सर्वत्र घुसले. एक तुकडा छातीमध्ये. माझ्याबरोबर पाठीवर वायरलेस सेट घेतलेला साथीदार जवान फार मोठ्या प्रमाणावर जखमी झाला.

आम्ही जखमी होऊन बेशुद्धावस्थेत कोसळलो. शुद्धीवर होतो त्या क्षणापर्यंत मातृभूमीचे व परमेश्‍वराचे चिंतन मनामध्ये करीत होतो. पहाटे-पहाटेच आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बेशुद्धावस्थेतच आम्हाला मेडिकल पॉइंटला हलविले. काही तासांच्या उपचारानंतर आम्ही शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शत्रूने वापरलेल्या बॉंबगोळ्यांची माहिती मला दिली. 81 मिलिमीटर मॉर्टर (उखळी तोफ) मधून सोडण्यात आलेला बॉंब इतका प्रभावी असतो, की त्याच्या स्फोट झालेल्या ठिकाणापासून 9 मीटर परिघातील अंतरावरील काहीही शिल्लक अथवा जिवंत राहत नाही; पण मी? मी वाचलो. माझा साथीदारही वाचला. कारण, त्याच्या पाठीवरील वायरलेस सेटने चिलखताची भूमिका बजावली होती; पण मी वाचलो केवळ परमेश्‍वराची कृपा व पुढे माझ्या हातून यापेक्षाही चांगली देशसेवा घडावी म्हणून असेच माझ्या मनाला वाटते.

मला माझ्या कामगिरीबद्दल ‘पर्पल हार्ट मेडल‘ मिळाले व महाराष्ट्र सरकारने या कारवाईबद्दल गौरव व मानधन देऊन सत्कार केला. सैन्यातील सेवा 10 वर्षांची होणे व युद्धातील पराक्रमाचा एक दिवस सममूल्याचा मानला जातो. म्हणून मला नेहमी शहीद भगतसिंगांच्या मातोश्रींचे उद्‌गार आठवतात, ‘देशासाठी एक वेळ मरणे म्हणजे शंभर वेळा जन्म घेण्यासारखे आहे.‘

- कर्नल सुरेश डी. पाटील

Thursday 29 September 2016

Pakistan summons Indian envoy to protest over surgical strikes

Islamabad: Pakistan today summoned Indian High Commissioner Gautam Bambawale over "surgical strikes" by India in which two Pakistani soldiers were killed.

Indian High Commissioner to Pakistan, Gautam Bambawale

Indian High Commissioner to Pakistan, Gautam Bambawale

Foreign Secretary Aizaz Chaudhry "condemned the unprovoked firing by" Indian forces on the surgical strikes in which two Pakistani soldiers were killed, Pakistan Foreign Office said in a statement.

"These incidents are a continuation of a pattern of ceasefire violations committed by India. He (Chaudhry) conveyed that the Armed Forces of Pakistan will continue to give a befitting response to any act of aggression," the statement said.

Earlier, Pakistan rejected as "baseless" the Indian Army's claim that it had carried out "surgical strikes" inside the country.

India carried out surgical strikes on seven terror launch pads across the LoC with the Army inflicting "significant casualties" on terrorists preparing to infiltrate from PoK.

While summoning Bambawale at the Foreign Office, the Foreign Secretary claimed that India has "deliberately escalated tensions" at the LoC in order to "divert the attention of the international community from the grave situation" in Kashmir.

"The Foreign Secretary condemned India's baseless accusation against Pakistan for the Uri attack, within a few hours after the incident. He recalled that it has been a practice in India to blame Pakistan for every such incident but later investigations prove otherwise," the Foreign Office said.

Chaudhry claimed that Pakistan remains a "victim of interference" and "state sponsored terrorism".

In this regard, he referred to the "confession statement of serving Indian Naval Officer, Kulbushan Jadhav", whom Pakistan has accused of "carrying out terrorist and subversive activities, especially in Balochistan and Karachi".

The Foreign Secretary also expressed Pakistan's deep disappointment at India's decision not to participate in the SAARC Summit.

For its part, Pakistan is committed to the objective of regional cooperation, envisaged in the SAARC charter, he said.

Chaudhry also conveyed to Bambawale, Pakistan's deep concerns over "life threats to Pakistan's High Commissioner in New Delhi" and urged the Indian government to ensure his safety and security and that of other officials and their families, in accordance with the Vienna Convention.

Inputs with PTI

Jobs and Career

Indian Government Jobs - www.indgovtjobs.in

Link to Indian Government Jobs - Today Employment News


Fresher Jobs 2016 (75,000 Govt Vacancies Opening)

Posted: 29 Sep 2016 05:38 AM PDT

Fresher and Final Year Graduate / Diploma / ITI Students get latest Indian Government Jobs vacancy openings in this post. IndGovtJobs Blog everyday updating New Govt Jobs for Fresh Graduates, Fresh...

SPSC Sikkim Recruitment 2016 Fireman, SIA (15 Vacancies)

Posted: 29 Sep 2016 05:35 AM PDT

Sikkim Public Service Commission (SPSC) invites applications from the eligible local candidates for filling up of 10 Vacancy posts of Firemen on temporary regular basis under Fire and Emergency...

CGPSC Recruitment 2016-17 Apply Online (92 Vacancies Opening)

Posted: 29 Sep 2016 05:08 AM PDT

Chhattisgarh Public Service Commission (CGPSC) invites Online applications for recruitment of Industry Assistant Director / Manager for filling up 52 Vacancies. The Online registration start from 3rd...

NIEPMD Recruitment 2016 Faculty and Non-Teaching Posts (24 Vacancies)

Posted: 29 Sep 2016 04:30 AM PDT

National Institute for Empowerment of Persons with Multiple Disabilities (NIEPMD) invites applications from the Indian Nationals eligible for appointment to the following temporary posts to be filled...

SAS Bihar Recruitment 2016 Apply Online (District Resource Person - 62 Vacancies)

Posted: 29 Sep 2016 03:59 AM PDT

Social Audit Society (SAS), Rural Development Department, Patna (Bihar State) invites Online applications for the post of District Resource Person for filling up 62 Vacancies. The last date for...

Kurukshetra University Recruitment 2016 Assistant Professors (64 Vacancies)

Posted: 29 Sep 2016 03:46 AM PDT

Kurukshetra University Kurukshetra (Established by the State Legislature Act XII of 1956) Walk in Interview for faculty post of Assistant Professors on contract basis in different disciplines for the...

UPSC ESE 2017 Apply Online for Engineering Services (440 Vacancies)

Posted: 29 Sep 2016 02:28 AM PDT

Union Public Service Commission (UPSC) will hold a Engineering Services Examination, 2017 (ESE 2017) for recruitment to the Group A and B services of various engineering posts in Civil, Mechanical...

UPSC Recruitment 2016-17, UPSC Exam 2016 (572 Vacancies Opening)

Posted: 29 Sep 2016 02:25 AM PDT

The Union Public Service Commission (UPSC) latest recruitment notification and current examination details listed in the page. UPSC is India's central agency conducting recruitment to various...

Ludhiana District Court Recruitment 2016 Stenographer (10 Vacancies)

Posted: 29 Sep 2016 01:29 AM PDT

Office of the District and Sessions Judge, Ludhiana invites applications for the post of Stenographer Grade-III for filling 10 Vacancies on Adhoc Basis. The last date for submission of applications...

Railway Board Recruitment 2016 Directors (04 Vacancies)

Posted: 29 Sep 2016 01:23 AM PDT

Government of India, Ministry of Railways (Railway Board) invites applications from eligible persons for the post of Managing Director and Directors on Deputation / Absorption basis in National High...

Ministry of Corporate Affairs Recruitment 2016 Deputation Posts (08 Vacancies)

Posted: 28 Sep 2016 11:48 PM PDT

Government of India, Ministry of Corporate Affairs, Competition Appellate Tribunal, New Delhi invites applications for filling up following positions purely on deputation basis, initially for a...

Employment News Paper 24th to 30th September 2016 Job Highlights

Posted: 28 Sep 2016 11:34 PM PDT

Employment News (English) / Rozgar Samachar (Hindi & Urdu) Paper every week issue Job Highlights available in the post. IndGovtJobs Blog every week updating Employment News weekly Issue Job...

IBPS RRB Recruitment 2016, IBPS RRB V Exam 2016-17 Apply Online (16560 Vacancies)

Posted: 28 Sep 2016 11:30 PM PDT

Institute of Banking Personnel Selection (IBPS) has published Recruitment exam notification of next Common Recruitment Process for IBPS CWE RRBs V (RRB 5 2016).  The Online examination of IBPS...

IIM Kashipur Recruitment 2016 Accounts Officer, Accounts Clerk

Posted: 28 Sep 2016 11:21 PM PDT

Indian Institute of Management (IIM), Kashipur invites applications for recruitment of following Non-Teaching positions on Regular Basis. The last date for submission of online applications is 17th...

10th 12th Pass Govt Jobs 2016 (15770 Vacancies Opening)

Posted: 28 Sep 2016 11:12 PM PDT

Indian National candidates / Students, who have holding 10th and 12th Qualification get Government Jobs recent recruitment notification. 10th 12th Pass candidates called for various posts in Govt...

Faculty Jobs 2016 (306 Govt Vacancies Opening)

Posted: 28 Sep 2016 08:47 AM PDT

Fresh and Experienced Teaching Professionals to get Faculty Govt Jobs in Central / State Government Universities / Institutes on this post. IndGovtJobs.in Blog every week updating / listing recent...

Teacher Jobs 2016, Govt Teaching Jobs 2016-17 (10,000 Vacancies)

Posted: 28 Sep 2016 08:34 AM PDT

Teachers Jobs for Primary / Secondary / High Secondary Government Schools Recruitment Vacancies listed in this page. Most of the State Government Education Board conducting mandatory entrance...

UPPSC Recruitment 2016-17 Apply Online (361 Vacancies Opening)

Posted: 28 Sep 2016 08:31 AM PDT

Uttar Pradesh Public Service Commission (UPPSC), Allahabad issued recruitment advertisement of Review Officer / Assistant Review Officer etc. General Recruitment Examination-2016 and Review Officer /...

BHEL Recruitment 2016 Part Time Medical Officer

Posted: 28 Sep 2016 08:00 AM PDT

Bharat Heavy Electricals Limited (BHEL), Power Sector Western Region, Nagpur invites applications from Medical Professionals for engagement of Part Time Medical Officer (PTMO) to meet requirement of...

BHEL ET Recruitment through GATE 2017 Apply Online (50 Vacancies)

Posted: 28 Sep 2016 07:51 AM PDT

Bharat Heavy Electricals Limited (BHEL) (A Govt. of India Enterprise) offers a challenging and rewarding career to young and dynamic Graduates for recruitment  post of Engineer Trainees in the...

Railway Recruitment 2016, Railway Jobs 2016-17 (3625 Vacancies Opening)

Posted: 28 Sep 2016 07:40 AM PDT

Railway Recruitment Boards (RRBs) offers Railway Jobs 2016 List published in this page. RRBs calls eligible Indian Citizens through Employment News for recruitment of various Technical, Non-Technical...