Wednesday 27 July 2016

कारगिल युद्धातील हुतात्म्यांना 'सॅल्यूट' - नरेंद्र मोदी - - पीटीआय

नवी दिल्ली - तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने 1999 मधील कारगिल युद्धात खंबीरपणा दाखविल्यानेच भारताला नेत्रदीपक विजय मिळाला. या युद्धात देशासाठी ज्या जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना माझा "सॅल्यूट‘, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

कारगिल विजय दिनानिमित्त मोदी यांनी आज "ट्विट‘ केले. मोदी म्हणाले, ‘1999 मध्ये त्यावेळच्या सरकारने खंबीरपणे घेतलेल्या निर्णयाचा मला आजही अभिमान वाटतो. कारगिलमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शत्रूंना भारतीय जवानांनी जशास तसे दिलेले उत्तर अविस्मरणीय आहे. भारतीय लष्कराच्या धैर्याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि भारत या धैर्याला कदापी विसरणार नाही. शेवटच्या श्‍वासापर्यंत जे जवान लढले, ज्यांनी देशासाठी त्याग केला, त्यांची प्रेरणा आम्ही घेत राहू.‘‘
द्रास येथे श्रद्धांजली
लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्ट. जनरल डी. एस. हुडा यांनी आज जम्मू आणि काश्‍मिराच्या द्रास भागात कारगिल युद्धातील हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. द्रास येथील ऐतिहासिक स्मृतीस्थळाला हुडा यांनी भेट दिली. कारगिल युद्धात भारतीय लष्कराने केलेल्या नेत्रदीपक कामगिरीचा त्यांनी या वेळी गौरव केला. या वेळी लष्करातील अधिकारी आणि जवान उपस्थित होते.

No comments:

Post a Comment