Sunday 31 July 2016

भारतातील वाढत्या असहिष्णुतेची संयुक्त राष्ट्रांना चिंता

वॉशिंग्टन - भारतातील वाढती असहिष्णुतेवर संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे. दलित व अल्पसंख्याकांवरील वाढत्या अत्याचारांमुळे भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी होत असून, नागरिकांच्या संरक्षणासाठी व वातावरण सुरळीत करण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांकडून करण्यात आले.


याबाबत बोलताना संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ता जॉन कर्बी म्हणाले, की आम्ही भारतीय लोकांसमवेत काम करण्याचे ठरविले असून, विशेषतः असहिष्णू वातावरण निवळण्याचा आमचा प्रयत्न राहील. तसेच भारत सरकारसोबत काम करून धार्मिक स्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर एकत्र काम करण्याचा मानस असल्याचे कर्बी यांनी या वेळी सांगितले. काश्‍मीर प्रश्‍नाबाबत दोन्ही बाजूंनी शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू असून, चर्चेतून मार्ग काढण्यावर आमचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment